Posts

Showing posts from February, 2025

वाडा पोलिसांची मोठी कारवाई: ८ तासांत अपहृत मुलीचा शोध घेऊन आरोपीला अटक

Image
वाडा पोलिसांची मोठी कारवाई: ८ तासांत अपहृत मुलीचा शोध घेऊन आरोपीला अटक पालघर : वाडा पोलिसांनी ८ वर्षाच्या अपहृत मुलीचा ८ तासांच्या आत शोध घेत आरोपीला ताब्यात घेतले. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी संजय गांधी नगर, वाडा येथील महिला फिर्यादीने पोलिसांत तक्रार केली की, त्यांची मुलगी घरासमोर खेळत असताना एक संशयित व्यक्ती तिला फसवून पळवून नेला. या गंभीर घटनेवर तात्काळ कार्यवाही करत वाडा पोलिसांनी अपहृत मुलीचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि जनसंवाद अभियानाचा वापर करत व्हॉट्सअप ग्रुपवर मुलीचा फोटो आणि संशयित आरोपीचे वर्णन प्रसारित केले. एका लहान मुलीने आरोपीचे नाव "डेव्हिड" असे सांगितले, आणि त्यावरून पोलिसांनी आरोपीच्या ठावठिकाणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन ऐनशेत गावात जात असताना दिसला. पोलिसांनी तत्काळ ऐनशेत गावातील नागरिकांची मदत घेत, वाडा आणि देसई परिसरात शोध घेत असताना, पहाटे ५ वाजेच्या सुमारास आरोपी शाखीनगर परिसरात लपून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुलीला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले...

तारापूर एमआयडीसीमधील औषध कंपन्यांवर केंद्र सरकारची कडक चौकशी

Image
तारापूर एमआयडीसीमधील औषध कंपन्यांवर केंद्र सरकारची कडक चौकशी टाफ्रोडॉल गैरव्यवहार प्रकरणात तिघांची तपासणी सुरू बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील औषध उत्पादन कंपन्यांवर केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांनी कडक नजर ठेवली आहे. विशेषतः, टाफ्रोडॉल औषधाच्या पुरवठ्यातील गैरव्यवहार प्रकरणामुळे तीन कंपन्यांची सखोल चौकशी सुरू आहे. यामध्ये एव्हिओ फार्मास्युटिकल्स प्रा. लि. (C-13), मॅक्सवेल लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड (T-53 आणि T-81) आणि नॅशनल फार्मास्युटिकल्स (G-18/1) या कंपन्यांचा समावेश आहे. टाफ्रोडॉल: संवेदनशील औषधावर लक्ष केंद्रित  टाफ्रोडॉल हे टॅपेंटाडॉल (Tapentadol) आणि कॅरिसोप्रोडॉल (Carisoprodol) या दोन प्रमुख घटकांचे मिश्रण असलेले एक वेदना कमी करणारे औषध आहे. हे औषध व्यसनाधीनतेला खतपाणी घालणारे आणि गैरवापरासाठी अतिशय संवेदनशील आहे. विशेषतः, कॅरिसोप्रोडॉलवरील नियम अधिक कडक करण्यात आले असतानाही, हे औषध मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध आहे. बाजारातील मोठी निर्यात   बीबीसीच्या ‘India’s Opioid Kings’ या माहितीपटाने भारतातील काही औषध कंपन्यांकडून टाफ्रोडॉल औषध घाना व इतर आफ्रिकन देशांमध्ये म...

पालघर पोलीस दलाने ७ कलमी कार्यक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक केला प्राप्त

Image
पालघर पोलीस दलाने ७ कलमी कार्यक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक केला प्राप्त पालघर. : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या ५० दिवसांच्या आढाव्यात पालघर पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा ७ कलमी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात वेबसाईट अद्ययावत करणे, नागरिकांसाठी Chat Box सुविधा, सायबर सुरक्षित पालघर मोहिम, स्वच्छता मोहिम, तक्रार निवारण दिन, ई-ऑफिस कार्यप्रणाली, AI आधारित Chat Bot, आणि पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय अॅप्लिकेशन यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. सदर कार्यक्रमा अंतर्गत २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आ...

कासा येथे २५ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त, एक आरोपी अटकेत

Image
कासा येथे २५ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त, एक आरोपी अटकेत कासा  - पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी मोहिमेची कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत कासा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो. नि. अविनाश मांदले यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गस्त घालत असताना, चारोटी येथील अप्सरा हॉटेलच्या समोर एक संशयित युवक एक मोठा बॅग घेऊन जात असताना आढळला. संशयित इसमास ताब्यात घेऊन अंगझडती घेतल्यावर, त्याच्या बॅगमध्ये कपड्यांच्या आत एक पिशवी सापडली. त्या पिशवीत सफेद कागदात सेलो टेपने गुंडाळलेले एक पुडके होते. संशयित युवकाने या वस्त्राबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, ज्यामुळे त्याच्या कृत्याबद्दल पोलीसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलीसांनी स्थानिक गुन्हे शाखेला संपर्क साधून अमली पदार्थ तपासणी किट मागवली. पो. हवा सूर्यवंशी यांच्या मदतीने तपासणी केली असता, त्यात एमडी (मेटाम्फेटामिन) अमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. या ड्रग्सचे वजन सुमारे १२५ ग्राम होते, आणि त्याची अंदाजे किंमत २५ लाख रुपये होती. रीतसर पंचनामा करू...

बोईसरमध्ये ऐतिहासिक नाट्यप्रयोग ‘देवी अहिल्याबाई होळकर यांची पुण्यगाथा’

Image
बोईसरमध्ये ऐतिहासिक नाट्यप्रयोग ‘देवी अहिल्याबाई होळकर यांची पुण्यगाथा’ बोईसर – सामाजिक सेवा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या 'विश्वमांगल्य सभा'च्या वतीने बोईसरमध्ये आयोजित भव्य नाट्यप्रयोग ‘देवी अहिल्याबाई होळकर यांची पुण्यगाथा’ अत्यंत उत्साहात पार पडला. या नाट्यप्रयोगाला एम3एम फाउंडेशनचे सहकार्य होते. बोईसर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा आनंद घेतला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने झाली. या नाट्यप्रयोगात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्याग, न्यायप्रियतेचे आणि समाज सुधारासाठी केलेल्या कार्याचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले. नाटकातील प्रसंग, संवाद आणि अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला स्वामी नारायणदास सरस्वती, खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, प्रशांत हलदरकर, तालिनी हावरे यांसारख्या मान्यवरांचा उपस्थिती लाभली. ‘भगेरीया इंडस्ट्रीज लिमिटेड’चे चेअरमन पुरुषोत्तम भगेरीया यांनी या नाट्य प्रयोगाचे कौतुक केले. ‘विश्वमांगल्य सभा’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष बप्पाजी जोशी यांनी बोलताना सांगितले, "...

बोईसरमध्ये इमारतींच्या मलमूत्रामुळे शिवकालीन बंधाऱ्याचे प्रदूषण, ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Image
बोईसरमध्ये इमारतींच्या मलमूत्रामुळे शिवकालीन बंधाऱ्याचे प्रदूषण, ग्रामस्थांचा तीव्र विरोध बोईसर : बोईसर पूर्व बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या इमारत बांधणीच्या कामांमुळे शिवकालीन बंधाऱ्यांमध्ये मलमूत्र आणि सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे बंधाऱ्यांमध्ये प्रदूषणाचा गंभीर मुद्दा निर्माण झाला असून, ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. गणेश कुंडात साचलेले मलमूत्र, प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. यावर माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य संदीप घरत यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी प्रदूषण विरोधी कंबर कसली आहे. पूर्व भागात सुरू होणाऱ्या इमारतींचे मलमूत्र आणि सांडपाणी पावसाळी पाण्यासोबत शिवकालीन बंधाऱ्यात सोडले जात असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो आहे. या बंधाऱ्यामुळे पाणी प्रदूषित झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांसाठी हानीकारक ठरले आहे. शिवाय, मूर्त्यांचे विसर्जन देखील बंधाऱ्यात होत असल्यामुळे श्रद्धाळूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. संदीप घरत यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळास लेखी कळवूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना म्हणणे आहे की, "प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या...

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एव्हीओ फार्मा कंपनीवर मोठी कारवाई : नशेच्या व्यापाराचा पर्दाफाश

Image
तारापूर औद्योगिक वसाहतीतील एव्हीओ फार्मा कंपनीवर मोठी कारवाई : नशेच्या व्यापाराचा पर्दाफाश बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील एव्हीओ फार्मासिटीकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) तसेच केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. आफ्रिकन देशांमध्ये निर्यात होणाऱ्या वेदनाशामक औषधांचा वापर नशेसाठी होऊ लागल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कंपनीच्या प्लॉट क्रमांक सी-13 वर औषधांच्या आडून अंमली पदार्थांचा काळा बाजार सुरू असल्याचे समोर आले आहे. ट्रामाडोल, टॅपेंटाडोल आणि केटोरोलॅक ट्रॉमिथामाइन (ओपीओआयड्स) यांसारखी औषधे मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात होती, ज्यांचा वापर नशेखोर टोळ्यांकडून ड्रग्सप्रमाणे केला जात होता. एफडीएने या प्रकरणी धडक कारवाई करत कंपनीच्या सर्व व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. औषधांच्या ट्रॅकिंग आणि रेग्युलेशनमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्याने संपूर्ण तारापूर औद्योगिक वसाहतीची चौकशी करण्याची मागणी स्थानिक पातळीवर उचलली जात आहे. केंद्रीय औषध प्रशासनाने कंपनीच्या औषध साठ्यावर तातडीने जप्ती आणली आहे, तसेच उत्पादन प्रक्रिये...

बोईसरमध्ये कारचालकाने तरुणाला जोरदार धडक देत नेले फरफटत; कारचालक फरार

Image
बोईसरमध्ये कारचालकाने तरुणाला जोरदार धडक देत नेले फरफटत; कारचालक फरार बोईसर : बोईसर एमआयडीसीमधील मधुर नाका ते मुकुट नाका रोडवरील पी डी मोटर्स समोर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता एक भीषण अपघात घडला. समृद्ध फार्मा कंपनीत काम करणारे मच्छिंद्र बागल हे सकाळी पायी कंपनीत जात असताना, मागून येणाऱ्या सिल्वर कलरच्या व्हॅगनार कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर बागल रस्त्यावर पडले आणि कार चालकाने त्यांना फरफडत नेत, कारच्या चाकाखाली घेतले. या अपघातात बागल गंभीरपणे जखमी झाले असून त्यांना त्वरित संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू आहेत. तथापि, अपघात घडल्यानंतर कारचालकाने जखमी कामगाराला दवाखान्यात न नेत, अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला. बोईसर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून या अपघाताची सखोल चौकशी केली जात आहे.

घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, दोन आरोपी अटक

Image
घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, दोन आरोपी अटक पालघर : पालघर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी आणि वाहन चोरीसह इतर गुन्ह्यांच्या तपासात मोठं यश मिळवलं आहे. विविध ठिकाणी झालेल्या घरफोडी व वाहन चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. १. मनोर पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरी दि. ११/०२/२०२५ ते १२/०२/२०२५ दरम्यान मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी श्री. राजु गणपत पाडेकर यांच्या घरासमोर उभी केलेली ८०,०००/- रुपयांची वेंगनर कार चोरट्यांनी चोरून नेली. यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २. तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी दि. ११/०२/२०२५ ते १२/०२/२०२५ दरम्यान तलासरी पाडवीपाडा येथील शोरूममधून ३,००,०००/- रुपयांची एक टाटा पंच कार चोरीला गेली. यावर देखील तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३. बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी दि. १५/०२/२०२५ रोजी बोईसर येथील एका मेडिकल दुकानातून ३०,०००/- रुपयांची रोख रक्कम चोरली गेली. यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४. सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी दि. १३/०२/२०२५ रोजी पाम गाव येथील श्री. ...

पालघरमध्ये समुद्रात उभारला जाणार भारतातील पहिला विमानतळ

Image
पालघरमध्ये समुद्रात उभारला जाणार भारता तील पहिला विमानतळ पालघर : महाराष्ट्रात आणखी एक महत्वाचा विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचारधीन आहे. मुंबईपासून 125 किमी अंतरावर असलेल्या पालघरमध्ये वाढवण बंदरा जवळ कृत्रिम बेटावर विमानतळ उभारण्याचा विचार केला जात आहे. हे विमानतळ समुद्रात उभारले जाणारे भारतातील पहिले विमानतळ ठरणार आहे. वाढवण बंदराच्या प्रकल्पानंतर, पालघरमध्ये विमानतळाच्या प्रस्तावाला वेग आला आहे. या विमानतळाची रचना हाँगकाँग आणि ओसाकाच्या कानसाई विमानतळांच्या रचनेसारखी असणार आहे. या विमानतळासाठी केंद्र आणि राज्य सरकारची प्राथमिक मंजुरी मिळाली असून, कृत्रिम बेटावर विमानतळ तयार करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपूर्वी वाढवण येथे विमानतळ होणार असल्याचे भाकित केले होते. पालघरमधील विमानतळ वाढवण बंदराशी जोडले जाईल, आणि या क्षेत्रात समुद्रातील 20 मीटर डीपड्राप जागा आहे. वाढवण बंदर हे जगातील 10 मोठ्या बंदरांपैकी एक आहे, आणि त्याची स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका आहे. जास्त खोलीच्या कारणामु...

अवैध गौणखनिज वाहतूकीवर बोईसर मंडळ अधिकारी विजय गुडंकर यांची धडक कारवाई; वाहन जप्त

Image
अवैध गौणखनिज वाहतूकीवर बोईसर मंडळ अधिकारी विजय गुडंकर यांची धडक कारवाई; वाहन जप्त बोईसर : बोईसर पूर्व भागातील दगड खाणीतून गौणखनिजांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना अशा अवैध वाहतुकीला विरोध करत असताना काही समाज कंटकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना देखील सामोरे जावे लागत आहे. तथापि, बोईसर मंडळ अधिकारी विजय गुडंकर यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी कंबर कसली आहे. गौणखनिजांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर विजय गुडंकर यांचे पथक गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील पांजरे पाडा या ठिकाणीं होत असलेल्या गौणखनिज वाहतूक करणारे चार ट्रक, एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर पकडण्यात यशस्वी झाले. संबंधित वाहने बोईसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून, त्यावर दंडाची रक्कम भरली जात नाही तोपर्यंत ते ताब्यात राहणार आहेत. विजय गुडंकर यांनी सांगितले की, "कुणाच्याही दबावाला बळी न पडता, अवैध गौणखनिज वाहतूकीविरोधात कडक कारवाई सुरू ठेवणार आहे आणि लवकरच यावर नियंत्रण मिळवले जाईल." या धडक कारवाईमुळे बोईसर परिसरात अवैध गौणखनिज वाहतुकीवर आळा बसण्या...

तलासरीत निर्दयीपणे नवजात अर्भकाला नदीत फेकण्याची धक्कादायक घटना

Image
तलासरीत निर्दयीपणे नवजात अर्भकाला नदीत फेकण्याची धक्कादायक घटना तलासरी : आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनी निर्दयीपणे नवजात अर्भकाला नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उधवा-तलासरी राज्यमार्गावरील उधवा-नवापाडा वाणीपाडा येथे नदीपात्रात एक नवजात पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. पुलाखालील गवतात अडकलेले अर्भक पाहून स्थानिक शेतकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी तलासरी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. प्राथमिक तपासानुसार, हे अर्भक एक ते दोन दिवसांचे असून पाण्याच्या प्रवाहात वाहून आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अमानुष कृत्यामुळे उधवा परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. "निर्दयीपणे नवजात बाळ नदीत फेकणाऱ्या नराधमांना तात्काळ शोधून कठोर शिक्षा व्हावी," अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून परिसरातील दवाखाने, प्रसूतिगृहे आणि रहिवाशांची चौकशी करून अर्भकाच्या मातापित्याचा शोध घेतला...

"कार बंद पडल्याने रस्त्याच्या बाजूला ढकलताना अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू"तर दुसरा जखमी

Image
" कार बंद पडल्याने रस्त्याच्या बाजूला ढकलताना अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू"तर दुसरा जखमी पालघर – हॉटेल फर्नजवळील ढेकाळे गावाच्या हद्दीत १५ फेब्रुवारीच्या रात्री घडलेल्या भीषण अपघातात रीतेश रमेश सिंह (वय ३४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रात्री अंदाजे ११:३० वाजता घडला. रीतेश सिंह आणि त्यांचा मित्र निखिल गणेश वडे हे नालासोपारा येथून बोईसरकडे जात होते. त्यांनी निखिलच्या मित्राची कार (MH.06AW.0799) वापरली होती. ढेकाळे गावाजवळ अचानक कार बंद पडली, ज्यामुळे दोघे मिळून कार रस्त्याच्या बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात रीतेश सिंह यांना गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने मनोर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. निखिल वडे यांच्यावर काशिमीरा येथील वोखार्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडवून अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. रीतेश सिंह यांच्या निध...

पालघर जिल्ह्यात आरोग्य मित्रांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू

Image
पालघर जिल्ह्यात आरोग्य मित्रांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू " आरोग्य मित्रांच्या संपामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा विस्कळीत" पालघर : पालघर जिल्ह्यात १८ फेब्रुवारी २०२५ पासून आरोग्य मित्रांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने १२ फेब्रुवारीपासून राज्यभर या आंदोलनाची सुरवात झाली होती. आरोग्य मित्रांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे. मागील २३ ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवसीय कामबंद आंदोलन केल्यानंतर, राज्य आरोग्य हमी सोसायटी आणि सहाय्य संस्थांनी मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, नव्या सरकारच्या स्थापनेनंतर या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी आरोग्य मित्रांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी सेवा बंद ठेवल्याने सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा विस्कळीत झाल्या आहेत. सामान्य रुग्णांना उपचारासाठी अडचणी निर्माण झाल्या असून, अनेक प्र...

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

Image
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांची कामे तत्काळ करावी – पालकमंत्री गणेश नाईक पालघर :  प्रत्येक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत, हे लक्षात घेऊन नागरिकांनी त्यांच्या कामकाजात सहकार्य करावे, असे आवाहन वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज पालघर येथे आयोजित जनता दरबारामध्ये केले. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृह, पालघर येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला. यावेळी, नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या 20 टेबलांची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री गणेश नाईक यांनी अभिवादन केले. जनता दरबारात एकूण 741 नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 36 तक्रारींचे निवारण तत्काळ करण्यात आले, तर 705 तक्रारी प्रलंबित राहिल्या. या तक्रारींचे निराकरण पुढील जनता दरबारात करण्यात येईल, असे पालकमंत्री ना...

दिव्यराज बिल्डरचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण ; तहसीलदाराकडून कारवाईचे आदेश

Image
दिव्यराज बिल्डरचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण ; तहसीलदाराकडून कारवाईचे आदेश बोईसर :  गायरान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार, गायरान जमिनीचे संरक्षण आवश्यक असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती आलोक आधारे आणि न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखवून पाम ग्रामपंचायतीकडून गट क्र १६० शासकीय गायरान जमिनीवर दिव्यराज प्रॉपर्टीज बिल्डरच्या अतिक्रमणास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच अशोक वडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करून केला आहे. पाम येथील रहिवासी हरिश्चंद्र माणक्या वडे यांची सर्वे क्र १७१ व १८/४ अ हि खाजगी जमीन दिव्यराज प्रॉपर्टीजचे भागिदार विरेंद्र शर्मा व जितेंद्र करानी यांनी खरेदी करून रहिवास व वाणिज्य प्रयोजनार्थ इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले असून या इमारतीत जाण्यासाठी शासकीय गायरान गट क्र १६० या जमीनीचा वापर करत आर सी सी कमानीचे बांधकाम करून प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. पाम येथील रहिवासी दत्तात्रय चंदू राऊत, पार्वती शंकर राऊ...

पाम ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यराज बिल्डरकडून गायरान जमिनीवर अतिक्रमण

Image
पाम ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यराज बिल्डरकडून गायरान जमिनीवर अतिक्रमण  ग्रामपंचायत व महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष  बोईसर – उच्च न्यायालयाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत, आणि अतिक्रमणाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आधारे आणि न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने गायरान जमिनींचे संरक्षण करणारा आदेश दिला असून, या आदेशानुसार अतिक्रमण हटवून कारवाई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, पाम ग्रामपंचायतीकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच अशोक वडे यांनी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, गट क्र. १६० च्या शासकीय गायरान जमिनीवर आजही अतिक्रमण सुरू असून, ग्रामपंचायतीकडून अतिक्रमणांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशोक वडे यांनी आरोप केला की, ग्रामपंचायतीतील काही विद्यमान सदस्यांच्या कुटुंबाने या शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे, ज्यामुळे एका महिला सदस्याला पदा पासुन मुकावे लागले आणि काही सदस्यांचे पद अजूनही टांगणीला असताना ग्रामपंचायतीकडू...

तारापूर औद्योगिक क्षेत्रात बांधकाम कामगार असुरक्षित: सुरक्षा उपकरणांचा अभाव

Image
तारापूर औद्योगिक क्षेत्रात बांधकाम कामगार असुरक्षित: सुरक्षा उपकरणांचा अभाव बोईसर :  तारापूर औद्योगिक क्षेत्रात एस के एफ एफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर जे १३८/१ येथे सुरू असलेल्या बांधकाम कामात, कामगारांच्या सुरक्षा नियमांची मोठ्या प्रमाणावर उलंघन होत आहे. काम करत असलेल्या मजुरांना आवश्यक सुरक्षा उपकरणे, जसे हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, जुराबे इत्यादी, उपलब्ध करून दिली जात नाहीत. सध्या काम करणारे कामगार ३० ते ४० फूट उंचावर काम करत असून, यामुळे त्यांचा जीव धोक्यात आहे. सुरक्षा उपकरणांची उणीव असलेले हे कामगार अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करत आहेत. असुरक्षित कामकाजामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका कायम आहे, ज्यामुळे कामगारांच्या जीवनाला धोका निर्माण होतो. यापूर्वीही तारापूर औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या असून, त्यांच्यानंतरही कामगारांच्या सुरक्षा संदर्भात कोणतीही पावले उचलली जात नाहीत. अशा परिस्थितीत कामगारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जाणे आवश्यक आहे.

पाम ग्रामपंचायतीत घरपट्टी घोटाळा उघडकीस: करोडो रुपयांचा अपहार

Image
पाम ग्रामपंचायतीत घरपट्टी घोटाळा उघडकीस: करोडो रुपयांचा अपहार पालघर : पालघर तालुक्यातील पाम ग्रामपंचायतीत घरपट्टी वसुलीच्या नावावर करोडो रुपयांचा अपहार झाल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. माजी सरपंच अशोक वडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, त्यात गंभीर आरोप केले आहेत. पाम ग्रामपंचायत हद्दीत २०० पेक्षा जास्त छोटे मोठे कारखाने असून, या कारखान्यांचे बांधकाम औद्योगिक विभागाच्या नियमांनुसार होत आहे. प्रत्येक बांधकामासाठी उपअभियंते यांची संमती घेणं अनिवार्य असते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, ग्रामपंचायतीकडून त्या बांधकामाचे मोजमाप आणि त्यानुसार घरपट्टी वसुली केली जाते. परंतु, माजी सरपंच अशोक वडे यांच्या आरोपानुसार, पाम ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी कारखाना मालकांसोबत संगनमत करून मोजमापाच्या निम्मा पेक्षा कमी मोजमाप दर्शवून व अत्यल्प रक्कम वसूल केली आहे, ज्यामुळे ग्रामपंचायतीला करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेषत: औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्र - एन ७९ मे रॉयल फार्मा या कारखान्याचा एकंदरीत मोजमाप १६७३१ चौ फुट असतानाही, ग्रामपंचायतीने फक्त ३००० चौ फुट मोज...

बोईसर शहरातील भीम नगर येथे महादेव स्टील दुकानाला लागली भीषण आग

Image
बोईसर शहरातील भीम नगर येथे महादेव स्टील दुकानाला लागली भीषण आग बोईसर : सोमवारी सकाळी सुमारे ४:३० वाजता बोईसर शहरातील भीम नगरमध्ये महादेव स्टील दुकानाला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. बादली आणि पाईपच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रचंड प्रयत्न झाला, मात्र आगीच्या ज्वालांचा वेग जास्त असल्यामुळे आग नियंत्रणात आणणे कठीण झाले. आग वाढल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ 112 आपातकालीन सेवेवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्वरित अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून शर्तीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे परिसरातील इतर दुकांन्यांचे बचाव झाले. या आगीत महादेव स्टील दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु कोणतीही जीवितहानी किंवा जखमी होण्याची माहिती नाही. पोलिस व अग्निशमन विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळ सुरक्षित केले आहे, आणि परिस्थिती आता सामान्य आहे.

वीज महावितरण विभागाच्या लापरवाहीमुळे पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Image
वीज महावितरण विभागाच्या लापरवाहीमुळे पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू पालघर, १६ फेब्रुवारी २०२५: महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे डहाणू तालुक्यातील सारणी येथील एक पाच वर्षीय चिमुकलीला जीवाला मुकावे लागले. सानिका संतोष पाचलकर या चिमुकलीचा टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. सानिका आपल्या कुटुंबासह शेतात राहत होती आणि कालव्याच्या पाण्याने खड्ड्यांत पाणी भरले होते. सानिका सायंकाळच्या सुमारास झोपडीतून बाहेर येत असताना येथील पाण्याने भरलेल्या एका मोठ्या खड्ड्यात ती पाय घसरुन पडली आणि पाण्यात बुडाली. कुटुंबीयांनी तिला बाहेर काढत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपस्थित डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर संतोष पाचलकर (वय २७) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शवविच्छेदनाच्या अहवालानुसार सानिकाचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे.  पोलीस निरीक्षक विलास नाना कोथे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वीज महावितरण विभागाने टॉवरसाठी खोदलेला खड्डा न ...