पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांची कामे तत्काळ करावी – पालकमंत्री गणेश नाईक



पालघर :  प्रत्येक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत, हे लक्षात घेऊन नागरिकांनी त्यांच्या कामकाजात सहकार्य करावे, असे आवाहन वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज पालघर येथे आयोजित जनता दरबारामध्ये केले. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृह, पालघर येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला.



यावेळी, नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या 20 टेबलांची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री गणेश नाईक यांनी अभिवादन केले.


जनता दरबारात एकूण 741 नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 36 तक्रारींचे निवारण तत्काळ करण्यात आले, तर 705 तक्रारी प्रलंबित राहिल्या. या तक्रारींचे निराकरण पुढील जनता दरबारात करण्यात येईल, असे पालकमंत्री नाईक यांनी स्पष्ट केले. यावेळी खा. डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार स्नेहा दुबे-पंडीत, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजन नाईक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.


पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे, असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू