दिव्यराज बिल्डरचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण ; तहसीलदाराकडून कारवाईचे आदेश
दिव्यराज बिल्डरचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण ; तहसीलदाराकडून कारवाईचे आदेश
बोईसर : गायरान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार, गायरान जमिनीचे संरक्षण आवश्यक असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती आलोक आधारे आणि न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखवून पाम ग्रामपंचायतीकडून गट क्र १६० शासकीय गायरान जमिनीवर दिव्यराज प्रॉपर्टीज बिल्डरच्या अतिक्रमणास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच अशोक वडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करून केला आहे.
पाम येथील रहिवासी हरिश्चंद्र माणक्या वडे यांची सर्वे क्र १७१ व १८/४ अ हि खाजगी जमीन दिव्यराज प्रॉपर्टीजचे भागिदार विरेंद्र शर्मा व जितेंद्र करानी यांनी खरेदी करून रहिवास व वाणिज्य प्रयोजनार्थ इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले असून या इमारतीत जाण्यासाठी शासकीय गायरान गट क्र १६० या जमीनीचा वापर करत आर सी सी कमानीचे बांधकाम करून प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.
पाम येथील रहिवासी दत्तात्रय चंदू राऊत, पार्वती शंकर राऊत, वत्सला कमळाकर राऊत व तुळसाबाई रघुनाथ राऊत यांना नवीन अविभाज्य शर्तीच्या अधिन राहून शासकीय गट क्र १६० मधून शेती प्रयोजनार्थ ०.७०.० हे आर चौ मीटर क्षेत्र जमीन शासनाकडून प्रधान करून १६०/११३ असा उपविभाग देण्यात आला होता. या भागिदारांची न अ शर्त असलेली या जमीनवर दिव्यराज बिल्डरकडून डांबरी रस्ता देखील विकसित करण्याचे काम सुरू केलेले असून गट क्र १६०/११३ या नवीन शर्त अविभाज्य शेती प्रयोजनार्थ जमीनीचे मालक दत्तात्रय चंदू राऊत, पार्वती शंकर राऊत व वत्सला कमळाकर राऊत यांना विश्वासात न घेता तुळसाबाई आणि नयना रघुनाथ राऊत यांनी परस्पर दिव्यराज प्रॉपर्टीज एल एल पी या कंपनीला मार्गाचा अधिकाराचा करार ( DEED OF GRANT OF RIGHT OF WAY ) दस्तऐवज नोंदणी करून घेऊन महाराष्ट्र अधिनियम क्र. २१-२००२, दिनांक ०६ मे २००२ अन्वये महार वतनी जमीन कायदाचा भंग केला गेला आहे.
दरम्यान माजी सरपंच अशोक वडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व पाम ग्रामपंचायत कार्यालयात सदर बाब लेखी निदर्शनास आणून देखील ग्रामपंचायत पदाधिकारी व महसूल विभागाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्यामुळे पत्रकारितेतून हि बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून पालघर तहसीलदारांचे लक्ष वेधण्याचे काम करत असताना तहसीलदार रमेश शेंडगे ॲक्शनमोडवर आले आहेत. गट क्र १६०/११३ या जमिनीवर दिव्यराज बिल्डरकडून सुरू असलेले कामकाज तात्काळ बंद करून तसा अहवाल तहसीलदार कार्यालयात सादर करावा असे आदेश मंडळ अधिकारी तारापूर यांना दिलेले असून दिव्यराज प्रॉपर्टीज एल एल पी या विकासकांनी शासनाकडून ( सर्वे क्र १७१ , १८/४ /अ ) या जमिनीवरील बांधकाम करता घेतलेली वाणिज्य रहिवासी बिनशेती परवानगी रद्द करण्यासाठी संबंधित कार्यालयात दाद मागणार असल्याचे अशोक वडे यांनी सांगितले आहे
Comments
Post a Comment