पालघरमध्ये समुद्रात उभारला जाणार भारतातील पहिला विमानतळ

पालघरमध्ये समुद्रात उभारला जाणार भारतातील पहिला विमानतळ


पालघर : महाराष्ट्रात आणखी एक महत्वाचा विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचारधीन आहे. मुंबईपासून 125 किमी अंतरावर असलेल्या पालघरमध्ये वाढवण बंदरा जवळ कृत्रिम बेटावर विमानतळ उभारण्याचा विचार केला जात आहे. हे विमानतळ समुद्रात उभारले जाणारे भारतातील पहिले विमानतळ ठरणार आहे.

वाढवण बंदराच्या प्रकल्पानंतर, पालघरमध्ये विमानतळाच्या प्रस्तावाला वेग आला आहे. या विमानतळाची रचना हाँगकाँग आणि ओसाकाच्या कानसाई विमानतळांच्या रचनेसारखी असणार आहे. या विमानतळासाठी केंद्र आणि राज्य सरकारची प्राथमिक मंजुरी मिळाली असून, कृत्रिम बेटावर विमानतळ तयार करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपूर्वी वाढवण येथे विमानतळ होणार असल्याचे भाकित केले होते. पालघरमधील विमानतळ वाढवण बंदराशी जोडले जाईल, आणि या क्षेत्रात समुद्रातील 20 मीटर डीपड्राप जागा आहे.

वाढवण बंदर हे जगातील 10 मोठ्या बंदरांपैकी एक आहे, आणि त्याची स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका आहे. जास्त खोलीच्या कारणामुळे, वाढवण बंदरात मोठ्या जहाजांची लांबी आणि क्षमता वाढवण्यास देखील मदत होणार आहे.

या प्रकल्पामुळे पालघरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, विमानतळाच्या उभारणीसह त्याचे महत्व आणखी वाढले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू