वीज महावितरण विभागाच्या लापरवाहीमुळे पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

वीज महावितरण विभागाच्या लापरवाहीमुळे पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू


पालघर, १६ फेब्रुवारी २०२५: महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे डहाणू तालुक्यातील सारणी येथील एक पाच वर्षीय चिमुकलीला जीवाला मुकावे लागले. सानिका संतोष पाचलकर या चिमुकलीचा टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली.

सानिका आपल्या कुटुंबासह शेतात राहत होती आणि कालव्याच्या पाण्याने खड्ड्यांत पाणी भरले होते. सानिका सायंकाळच्या सुमारास झोपडीतून बाहेर येत असताना येथील पाण्याने भरलेल्या एका मोठ्या खड्ड्यात ती पाय घसरुन पडली आणि पाण्यात बुडाली. कुटुंबीयांनी तिला बाहेर काढत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपस्थित डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर संतोष पाचलकर (वय २७) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शवविच्छेदनाच्या अहवालानुसार सानिकाचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 


पोलीस निरीक्षक विलास नाना कोथे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वीज महावितरण विभागाने टॉवरसाठी खोदलेला खड्डा न बुजवला, आणि त्यात साठलेल्या पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर महावितरण विभाग, ठेकेदार आणि कासा पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेमुळे पालघर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू