पालघर पोलीस दलाने ७ कलमी कार्यक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक केला प्राप्त

पालघर पोलीस दलाने ७ कलमी कार्यक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक केला प्राप्त


पालघर. : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या ५० दिवसांच्या आढाव्यात पालघर पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा ७ कलमी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात वेबसाईट अद्ययावत करणे, नागरिकांसाठी Chat Box सुविधा, सायबर सुरक्षित पालघर मोहिम, स्वच्छता मोहिम, तक्रार निवारण दिन, ई-ऑफिस कार्यप्रणाली, AI आधारित Chat Bot, आणि पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय अॅप्लिकेशन यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.


सदर कार्यक्रमा अंतर्गत २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


हे यश पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी व अंमलदार यांच्या मेहनतीचे फळ आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू