Posts

Showing posts from April, 2025

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस २९ दिवसांत शिक्षा – पालघर पोलिसांची जलद आणि ठोस कारवाई

Image
महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस २९ दिवसांत शिक्षा – पालघर पोलिसांची जलद आणि ठोस कारवाई पालघर  – केळवे रोड परिसरात एका महिलेसोबत छेडछाड व विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अवघ्या २९ दिवसांत शिक्षा सुनावण्यात आली असून, ही कारवाई पालघर पोलिसांसाठी उल्लेखनीय ठरत आहे. दिनांक ३० मार्च २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता धोंदलपाडा, केळवे रोड (पूर्व) येथे पीडित महिला टिकली तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल घेऊन पायी जात असताना, आरोपी ओमकार संतोष जाधव (रा. पिलाजीनगर, केळवे रोड पूर्व) याने तिच्या अंगावर धाव घेत, तोंड दाबून, मान पकडून अडवले. महिलेने प्रतिकार करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने तिच्या साडीला मागून पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादीवरून सफाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ अंतर्गत ३१ मार्च २०२५ रोजी दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि दत्ता शेळके (प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली, तपासिक अंमलदार पोना बी. के. भावर यांनी २४ तासांच्या आत पुरावे गोळा करून १ एप्रिल २०२५ रोजी दोष...

"आईच झाली खुनी, नवजात बालिकेची नाकदाबून हत्या"

Image
"आईच झाली खुनी, नवजात बालिकेची नाकदाबून हत्या" पालघर - पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लोणीपाडा गावात चौथ्यांदा मुलगी झाल्याने नाराज झालेल्या एका महिलेने आपल्या दोन दिवसांच्या नवजात चिमुरडीची गळा घोटून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोलकत्याहून माहेरी आलेल्या पुनम शहा (वय ३०) हिने ही संतापजनक कृती केली असून, डहाणू पोलिसांनी तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. पुनम शहा ही आपल्या तीन मुलींनंतर पुन्हा चौथ्या अपत्याच्या जन्मासाठी कोलकत्याहून माहेरी, डहाणू तालुक्यातील लोणीपाडा येथे आली होती. तिच्या चौथ्याही अपत्याने मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे ती प्रचंड नाराज होती. या रागातून तिने आपल्या अवघ्या दोन दिवसांच्या नवजात मुलीचे नाक आणि तोंड दाबून श्वास रोखून तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डहाणू पोलीस ठाण्यात सदर महिलेविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलिसांनी तिला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे डहाणू तालुक्यात तसेच पालघ...

करमतारा कंपनी हटवा, सूर्या नदी वाचवा! पांजरेत जनतेचा प्रचंड एल्गार

Image
करमतारा कंपनी हटवा, सूर्या नदी वाचवा! पांजरेत जनतेचा प्रचंड एल्गार करमतारा विरोधात सामाजिक संघटनांचा एकत्रित आवाज; सूर्या नदी वाचवण्यासाठी निर्धार बोईसर – बोईसर पूर्व स्थित पवित्र सूर्या नदीचे रक्षण आणि बोईसर, तारापूर, वसई-विरार परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी रविवारी पांजरे येथे करमतारा कंपनीविरोधात जोरदार आंदोलनपूर्व सभा आयोजित करण्यात आली. विविध सामाजिक संघटनांचे नेते आणि शेकडो नागरिकांनी एकवटून "करमतारा हटवा, सूर्या वाचवा" असा निर्धार व्यक्त केला. सामाजिक संघटनांचा एकत्रित आवाज   या सभेला उलगुलान ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंगाडा, मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष भावेश चुरी, भूमी सेनेच्या नेत्या नीता काटकर, आदिवासी एकता परिषदेचे नेते दत्ता करबट, सामाजिक कार्यकर्ते रमेश डोंगरे, वैभव पाटील, अविनाश पाटील (कुणबी सेना), संजय पाटील, रोहन पाटील, लोकशाहीर गंगाराम घरत, जयस संघटनेचे प्रसाद पराड, भरत भोईर, डॉ. अनंत हाडल, किरण राऊत यांसह शेकडो महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणांनी दणाणला परिसर   सूर्या नदीच्या परिसरात झिंक व गंधकासारख...

किसान मोल्डिंग कंपनीत चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल"

Image
" किसान मोल्डिंग कंपनीत चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल" बोईसर : बोईसर पूर्वे महागाव येथील औद्योगिक परिसरातील किसान मोल्डींग कंपनीत चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता कुकडे महागाव येथील कंपनीत हा प्रकार घडला. रमेशकुमार जशराज शर्मा (वय ४२ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मंगेश भोईर (पूर्ण नाव अद्याप अज्ञात) व त्याच्यासोबत असलेल्या एका अज्ञात साथीदाराने संगनमत करून कंपनीतील अंदाजे २६ किलो वजनाचे ब्रास इन्सर्ट चोरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी १८१/२०२५ या गुन्हा नोंदवला असून, भारतीय दंड विधानाच्या कलम ३०५, ६२ व ३(५) नुसार कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

टीईपीएसमार्फत नेमणूक केलेल्या E & Y संस्थेमुळे औद्योगिक क्षेत्रात गोंधळ"

Image
टीईपीएसमार्फत नेमणूक केलेल्या E & Y संस्थेमुळे औद्योगिक क्षेत्रात गोंधळ" "बाह्य संस्थेच्या प्रतिनिधींनी उद्योगास भेट देऊन चौकशी करणे बेकायदेशीर – राजू वसावे" बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी टीईपीएस संस्थेमार्फत सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. टीईपीएसने त्यांच्या कामाच्या सोयीसाठी E & Y या बाह्य संस्थेची नियुक्ती केली असली तरी पर्यावरण विभागाला त्याची अधिकृत माहिती न दिल्यामुळे या संस्थेच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित होत आहे. याशिवाय, E & Yचे प्रतिनिधी दीपक कानडे यांनी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाऊन तपासणी करणे आणि नमुने गोळा करणे, हे अधिकृत अधिकाराशिवाय केले असून उद्योग प्रशासनाला धमकावल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी पालघर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती. पर्यावरण विभागाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण केले असता, E & Y संस्थेचे प्रतिनिधी तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसल्याचे आणि त्यांची तपासणी प...

गावकऱ्यांची दिशाभूल करून पोलीस पाटलांवर खोटी तक्रार; सहा जणांवर गुन्हा दाखल

Image
गावकऱ्यांची दिशाभूल करून पोलीस पाटलांवर खोटी तक्रार; सहा जणांवर गुन्हा दाखल विक्रमगड : आपटी खुर्द गावातील पोलीस पाटील सौ. विद्या विजय पाटील यांच्या विरोधात खोटी तक्रार करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध विक्रमगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकिता अंकुश वाघ (वय ५० वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आपटी खुर्द) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रविंद्र बच्चू रिंजड (वय ४५), सुधीर विश्वनाथ पाटील (वय ३९), रोहित भाई पाटील (वय २४), स्वप्निल मुकुंद पाटील (वय ३६), प्रमोद विश्वनाथ पाटील (वय ४९) आणि गजानन श्रीधर पाटील (वय ४४) या आरोपींनी गावातील नागरिकांची दिशाभूल करून गावठण मोजणी व शौचालय बांधणीसाठी सह्या व अंगठे गोळा केले. त्यानंतर या सह्या व अंगठ्यांचा वापर करून गावचे पोलीस पाटील सौ. विद्या विजय पाटील यांच्या विरोधात प्रांत कार्यालय तसेच विक्रमगड येथे खोटी तक्रार सादर करण्यात आली.  सौ. विद्या विजय पाटील या गावात प्रामाणिकपणे व चोख कार्य करत असतानाही त्यांच्या प्रतिमेला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाख...

२७.९५ लाखांचा सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा साठा जप्त; राजस्थानातील दोन जण अटकेत

Image
२७.९५ लाखांचा सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा साठा जप्त; राजस्थानातील दोन जण अटकेत पालघर : तलासरी परिसरात अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २७.९५ लाख रुपये किमतीचा सुगंधित सुपारी, तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी राजस्थानच्या झुनझुनु जिल्ह्यातील दोन चालकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई २५ एप्रिल रोजी दुपारी ३.१० वाजता हिमाचल पंजाब ढाबा, मुंबई-गुजरात महामार्गावर करण्यात आली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर संशयास्पद हालचाली दिसून येताच पोलिसांनी तपासणी केली असता टेम्पो क्रमांक RJ-14-GR-9303 मधून मोठ्या प्रमाणावर सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ साठवलेले आढळून आले. यात अटक करण्यात आलेले आरोपी श्यामपाल बहादुर सिंग (३६) आणि बीजेंदर रामनिवासकुमार (२८) यांनी राज्य सरकारच्या अधिसूचनेचा उल्लंघन करून आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक केली होती. त्यांना रात्री १०.१८ वाजता अटक करण्यात आली. जप्त मुद्देमाल: सुपर कॅश गोल्ड सुगंधीत पान मसाला : २००० पाउचेस, किंमत २,४०,००० रुपये VC-5 च्युइंग तंबाखू : १८६० पाउचेस, किंमत ५५,८०० रुपये आयशर टेम्पो (RJ...

पालघरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध आंदोलन

Image
पालघरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध आंदोलन पालघर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पालघर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी (ता. २५) दुपारी २ वाजता शहरातील जामा मशिदेच्या बाहेर, नमाज पठणानंतर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हा निषेध नोंदवला. देशभरात या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असताना, पालघरमधील मुस्लिम समाजानेही या घटनेविरोधात एकजूट दाखवत निषेध आंदोलन केले. यावेळी उपस्थितांनी हातावर काळ्या फिती बांधून हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली व शोक व्यक्त केला. निषेध आंदोलनादरम्यान 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'दहशतवादाचा नाश होवो', 'पाकिस्तानवर कारवाई करा' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फाडून जाळण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारकडे दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणीही केली. या आंदोलनात मुस्लिम समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, युवक व ज्य...

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर पालघर जिल्ह्यात सागरी सुरक्षा वाढवली

Image
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर पालघर जिल्ह्यात सागरी सुरक्षा वाढवली पालघर : पहलगाम येथे घडलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात सागरी सुरक्षेचे उपाय अधिक बळकट करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व सागरी पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, गस्त व देखरेख अधिक तीव्र करण्यात आली आहे. पालघर सागरी घटकात सध्या चार गस्त नौका असून, त्यापैकी एक नौका कार्यरत आहे आणि ती नियमित सागरी गस्त करत आहे. एक नौका स्थानिक दुरुस्तीदाराकडे दुरुस्तीसाठी दिली असून, उर्वरित दोन नौकांच्या आधुनिकीकरणासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. त्या दोन्ही नौकांचे दुरुस्ती काम सुरु आहे. सुरक्षेच्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून मत्स्यविभागाच्या सहकार्याने दोन ड्रोनच्या साहाय्याने खाडी किनाऱ्याची देखरेख केली जात आहे. या ड्रोन पेट्रोलिंगवर स्थानिक पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून सतत लक्ष ठेवले जात आहे. आवश्यकतेनुसार खाजगी बोटींचाही सागरी गस्तीसाठी वापर करण्यात येत आहे. तसेच भारतीय तटरक्षक दल, मत्स्यविभाग, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, कस्टम विभाग आणि पोलीस दल यांच्या संयुक्त सागरी गस्तीद्वारे सुरक्षा ...

सगीता केमिकल प्रा. लि. च्या उत्पादनावर बंदी

Image
सगीता केमिकल प्रा. लि. च्या उत्पादनावर बंदी पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याने MPCB ची कारवाई तारापूर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एन-३/४ मध्ये असलेल्या सगीता केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उत्पादनावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कडक कारवाई करत बंदी घातली आहे. येत्या ४८ तासांत कारखान्याची पाणी आणि वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरण व उद्योग विभागाला लेखी स्वरूपात देण्यात आले आहेत. २ फेब्रुवारी २०२५ रोजी, कारखान्याच्या उत्पादनादरम्यान निर्माण होणारे घातक रासायनिक पाणी लगतच्या मोकळ्या भूखंडावर खुलेआम सोडले जात असल्याचे निरीक्षण उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे आणि क्षेत्रीय अधिकारी विश्वजीत सोरगे यांनी केले होते. या गैरप्रकारामुळे परिसरातील ओहोळांमध्ये रासायनिक पाण्याचे प्रवाह पाम व कुंभवली गावाच्या दिशेने वाहताना दिसून आले होते. सदर प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सखोल चौकशी करून वसावे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ अहवाल सादर केला होता. त्यांनी १३ फेब्रुवारी रोजी उत्पादन बंदीची अधिकृत मागणी केली होती.  अहवालानुसार, कंपनीच्य...

हरित आच्छादन निकषांमुळे तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांचे गुजरातकडे स्थलांतर

Image
हरित आच्छादन निकषांमुळे तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांचे गुजरातकडे स्थलांतर तारापूर :  तारापूर एमआयडीसीमधील अनेक जुन्या रासायनिक युनिट्सनी पर्यावरणीय निकष, विशेषतः ४०% हरित आच्छादन (ग्रीन कव्हर) अनिवार्यता , पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यामुळे आपले कामकाज गुजरातकडे हलवण्यास सुरुवात केली आहे. २००६ च्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) अधिसूचनेनुसार लागू झालेल्या या आदेशामुळे उद्योगपतींना विस्तार किंवा विविधीकरणाच्या दृष्टीने गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गुजरातकडील लवचिक नियम ठरत आहेत आकर्षणाचे केंद्र गुजरातमध्ये कारखान्यांना त्यांच्या परिसराबाहेरही हरित क्षेत्र विकसित करण्याची मुभा दिल्यामुळे, सायखा व दहेज सारख्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये स्थलांतराची प्रवृत्ती वाढली आहे. तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (TIMA) सचिव एस.आर. गुप्ता यांनी सांगितले की, " सहा-सात कंपन्यांनी गुजरातमध्ये स्थलांतर केले आहे आणि आणखी २०-२५ कंपन्या प्रक्रियेत आहेत ". युनिट्ससह कामगारही मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होत आहेत. जमिनीची मर्यादा आणि वाढलेला खर्च ठरत आहे मुख्य कारण तार...

आईच्या हातून निसटून २१व्या मजल्यावरून पडून सात महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Image
आईच्या हातून निसटून २१व्या मजल्यावरून पडून सात महिन्यांच्या बाळाचा मृत्यू  सात वर्षांनी मिळालेला आनंद सात महिन्यांत हरपला  विरार : विरार (पश्चिम) येथील एका गगनचुंबी इमारतीत बुधवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. केवळ सात महिन्यांचे बाळ आईच्या हातून निसटून २१व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाला ताप होता आणि तब्येत सुधारल्यावर आई त्याला डॉक्टरकडून घरी घेऊन आली होती. घरी आल्यानंतर पाहुणे भेटायला आले होते. त्यावेळी बाळाला खांद्यावर घेत असताना आईला चक्कर आल्याने तिचा तोल गेला आणि बाळ तिच्या हातातून निसटून थेट खाली पडले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विशेषतः या दाम्पत्याला सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अपत्यप्राप्ती झाली होती, आणि अवघ्या सात महिन्यांतच त्यांच्या आनंदाचे दुःखात रूपांतर झाले. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी दिली.

बोईसरमध्ये अनधिकृत गाळ्यांवर ग्रामपंचायतीची कारवाई

Image
बोईसरमध्ये अनधिकृत गाळ्यांवर ग्रामपंचायतीची कारवाई बोईसर : यादव नगर आणि धनानी नगर परिसरात अनधिकृतपणे उभारलेल्या व्यावसायिक गाळ्यांवर बोईसर ग्रामपंचायतीने आज सकाळपासून तोडक कारवाई सुरू केली. ग्रामपंचायतीच्या माहितीनुसार, या गाळ्यांसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही बांधकामे बेकायदेशीर ठरवून कारवाई करण्यात आली. सरपंच दिलीप धोडी यांनी सांगितले की, “अनधिकृत बांधकामांविरोधात ग्रामपंचायत कडक भूमिका घेत आहे. येत्या काळात काटकर पाडा, दांडी पाडा आणि धनानी नगरमधील इतर बेकायदेशीर चाळी, घरे आणि गाळ्यांवरही कारवाई होणार आहे.” या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, ग्रामपंचायतीच्या भूमिकेचं काही नागरिकांनी स्वागत केलं आहे.

बोईसर मालवाहू यार्ड स्थलांतर प्रकरणावर जिल्हा प्रशासन अनभिज्ञ; चित्रालय परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता

Image
बोईसर मालवाहू यार्ड स्थलांतर प्रकरणावर जिल्हा प्रशासन अनभिज्ञ; चित्रालय परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता बोईसर – महिन्याला ८० ते १०० मालगाड्यांद्वारे स्टील व इतर अवजड वस्तूंची वाहतूक करणारे बोईसर रेल्वे स्थानकालगतचे मालवाहू यार्ड आता बोईसर पश्चिमेतील बीएआरसीच्या जुन्या गोडाऊनजवळ स्थलांतरित करण्याचे काम वेगात सुरू आहे. मात्र, या महत्त्वाच्या प्रकल्पाविषयी जिल्हा प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे भविष्यात वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन यार्ड कार्यरत झाल्यास ८० ते १०० ट्रेलर प्रतिदिन चित्रालय परिसरातून ये-जा करतील, ज्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. सद्यस्थितीत मालवाहतुकीसाठी दोन यार्ड कार्यरत असून, त्यातून २२ टन वजनाच्या सुमारे १०० ते १२० स्टील कॉईल्सची वाहतूक केली जाते. या मालाची वाहतूक अवजड ट्रेलर्सद्वारे केली जाते, जे येत्या काळात नागरी भागांतून मार्ग काढतील. याव्यतिरिक्त, प्रस्तावित यार्डच्या रेल्वे मार्गिकेवर तसेच चित्रालय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्ते रुंदीकरण व भूसंपा...

टपऱ्यांवर गुटख्याचे साम्राज्य; बोईसर बनतोय गुटखा हब"

Image
टपऱ्यांवर गुटख्याचे साम्राज्य; बोईसर बनतोय गुटखा हब" बोईसर : राज्य सरकारने गुटख्यावर बंदी घातलेली असतानाही बोईसरमध्ये खुलेआम गुटख्याची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. बोईसरमधील जारा किराणा अँड जनरल स्टोअरमध्ये सर्रास गुटख्याची विक्री सुरू असून, गुजरातमधील सेलवास, बिलाड आणि संजाण येथून मोठ्या प्रमाणावर गुटखा तयार करून महाराष्ट्रात त्याची तस्करी केली जाते. पालघर पोलिसांकडून अनेकदा कारवाई करण्यात आली असली तरी गुटख्याची वाहतूक बोईसरमध्ये सहजपणे होते. शिगाव रोडवरील ‘हाफिजीचा अमन’ म्हणून ओळखला जाणारा गुटखा माफिया बोईसरमधील बेकायदेशीर टपऱ्यांवर गुटख्याचा पुरवठा करत आहे. हार्मोनी रेसिडेन्सी, रेल्वे स्थानक, डिजयनगर आणि बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यालगत गुटख्याच्या टपऱ्या खुलेआम उभ्या राहिल्या असून, त्यातून 'गोवा', 'विमल', 'रजनीगंधा' यांसारख्या गुटख्याचे पाकिटे खुलेआम विकले जात आहेत. ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध दर्शवूनही बोईसर ग्रामपंचायती कडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली ना...

"वाडा तालुक्यात २५ वर्षांपूर्वी विकलेल्या जमिनीची परस्पर विक्री; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल"

Image
"वाडा तालुक्यात २५ वर्षांपूर्वी विकलेल्या जमिनीची परस्पर विक्री; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल" वाडा : सापने व गो-हे गावातील तब्बल २५ वर्षांपूर्वी खरेदी केलेली जमीन परस्पर विकल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल मुरली चावला (वय ५६, रा. वसई पश्चिम) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मयत वडिलांनी मुरली मदनमोहन चावला यांनी सन १९९५ मध्ये सापने बुद्रुक येथील १६५ गुंठे जमीन पद्माकर पोटु भोईर (रा. सुपोंडे) याच्याकडून विकत घेतली होती. त्याचप्रमाणे, गो-हे गावातील सुमारे ८७.७ गुंठे जमीन शरयु आंबो गायकवाड (रा. सापने बुद्रुक) यांच्याकडून खरेदी केली होती. यासंबंधी अधिकृत दस्तऐवज व खरेदीखतही तयार करण्यात आले होते. मात्र, सदर जमिनींचे ७/१२ उतारे फिर्यादीच्या वडिलांच्या नावावर होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. या संधीचा गैरफायदा घेत आरोपींनी परस्पर पद्धतीने ही जमीन इतर त्रयस्थ व्यक्तीला विकून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आले आहे. या प्रकारामुळे चावला कुट...