टीईपीएसमार्फत नेमणूक केलेल्या E & Y संस्थेमुळे औद्योगिक क्षेत्रात गोंधळ"

टीईपीएसमार्फत नेमणूक केलेल्या E & Y संस्थेमुळे औद्योगिक क्षेत्रात गोंधळ"

"बाह्य संस्थेच्या प्रतिनिधींनी उद्योगास भेट देऊन चौकशी करणे बेकायदेशीर – राजू वसावे"



बोईसर :
तारापूर औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी टीईपीएस संस्थेमार्फत सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. टीईपीएसने त्यांच्या कामाच्या सोयीसाठी E & Y या बाह्य संस्थेची नियुक्ती केली असली तरी पर्यावरण विभागाला त्याची अधिकृत माहिती न दिल्यामुळे या संस्थेच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित होत आहे. याशिवाय, E & Yचे प्रतिनिधी दीपक कानडे यांनी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाऊन तपासणी करणे आणि नमुने गोळा करणे, हे अधिकृत अधिकाराशिवाय केले असून उद्योग प्रशासनाला धमकावल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी पालघर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती. पर्यावरण विभागाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण केले असता, E & Y संस्थेचे प्रतिनिधी तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसल्याचे आणि त्यांची तपासणी प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी टीईपीएसच्या चुकीच्या धोरणांमुळे २५ एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पावर राष्ट्रीय हरित लवादाने १६० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता, ज्यामुळे अनेक कारखानदारी संकटात आले होते. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ५० एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाची जबाबदारी टीईपीएसकडे सोपवून, E & Y संस्थेचे अतांत्रिक प्रतिनिधी नैसर्गिक नाले व हरित भूखंडांवर रासायनिक पाण्याचा साठा करून रासायनिक प्रदूषणाला खतपाणी घालत असल्याचे गंभीर आरोप उद्योग प्रतिनिधी करत आहेत.


"राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना उद्योग तपासणीसाठी प्रदान केलेले कायदेशीर अधिकार"


राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, १९७४ आणि वायु प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, १९८१ अंतर्गत उद्योगांची तपासणी करण्याचे अधिकार प्रदान केलेले आहेत. या अधिनियमांमधील जल अधिनियमाचा कलम १३ आणि वायू अधिनियमाचा कलम २४ यानुसार फक्त मंडळाने नियुक्त केलेले अधिकारीच उद्योगांमध्ये प्रवेश करून तपासणी करण्याची कार्यवाही करू शकतात. अशा परिस्थितीत, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नेमणूक केलेल्या क्षेत्र अधिकारी व उपप्रादेशिक अधिकारी यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात उद्योग तपासणीचे स्पष्ट कायदेशीर अधिकार असताना, टीईपीएस संस्थेने एखाद्या बाह्य संस्थेमार्फत उद्योगांची तपासणी करून घेणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे तपासणीच्या कायदेशीरतेबाबत आणि प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत आहेत.


"तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योग प्रतिनिधींना उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांचे महत्त्वाचे आवाहन"


औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणाऱ्या सर्व सांडपाण्याचे संकलन एमआयडीसीमार्फत टीईपीएस या संस्थेकडून सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात केले जात आहे. येथे बाह्य तज्ञ प्रतिनिधींच्या मदतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रियेनंतर संबंधित उद्योगाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिलेली कसेंट तपासून, विहित मानकांची पूर्तता झाल्यासच प्रक्रिया केलेले सांडपाणी एमआयडीसीमार्फत पाइपलाईनद्वारे खोल समुद्रात सोडणे आवश्यक आहे. टीईपीएस ही कायदेशीररित्या स्थापन झालेली खाजगी संस्था आहे, आणि त्यांच्या किंवा त्यांनी नेमलेल्या सबकंत्राटी कंपन्यांच्या (जसे E & Y कंपनी) प्रतिनिधींना औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना भेट देणे किंवा उद्योगाच्या आत प्रवेश करणे हे बेकायदेशीर आहे. यासंदर्भात सर्व उद्योग प्रतिनिधींनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी केले आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू