Posts

Showing posts from July, 2025

तारापूरमधील मे मॅक्स हील कंपनीत कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; औद्योगिक सुरक्षा नियमांचा भंग

Image
तारापूरमधील मे मॅक्स हील कंपनीत कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; औद्योगिक सुरक्षा नियमांचा भंग बोईसर – पालघर जिल्ह्यात हवामान विभागाकडून सतत वादळी वाऱ्यांचे आणि अतिवृष्टीचे इशारे दिले जात असतानाही तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मे मॅक्स हील (प्लॉट क्र. जे-०७) या कंपनीत कामगारांच्या सुरक्षिततेकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर  आला आहे. सदर कारखान्यात छतावर वजनी पत्रे चढवण्याचे काम सुरू असून, कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा साधनांशिवाय उंचावर चढवले जात आहे . काम सुरू असलेल्या ठिकाणी वारा आणि पावसाचा जोर लक्षात घेता ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. विशेष म्हणजे, कामगारांनी सुरक्षा पट्ट्याबाबत विचारणा केली असता , कंपनी प्रशासनातील सावंत नावाच्या अधिकाऱ्याने "सुरक्षा पट्टा लावल्यास काम करताना अडचण होते" असे बेजबाबदार वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे औद्योगिक सुरक्षा विषयक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले असून , कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. संबंधित घटनेबाबत औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे संचालक ...

बोईसर स्टेशनजवळ फाटलेला बॅनर तारेवर लटकला; प्रवाशांच्या सुरक्षेला धोका"

Image
बोईसर स्टेशनजवळ फाटलेला बॅनर तारेवर लटकला; प्रवाशांच्या सुरक्षेला धोका" बोईसर – बोईसर रेल्वे स्टेशनजवळील एका व्यावसायिक इमारतीवर लावलेला जाहिरात बॅनर फाटून थेट रस्त्यावरच्या तारेवर लटकताना आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या रस्त्यावरून रोज हजारो प्रवासी व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या बॅनरमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सदर बॅनर हवेमुळे तुटून अर्धवट लोंबकळत आहे. या ठिकाणी नेहमीच रहदारी असून, जर हा बॅनर थेट रस्त्यावर पडला असता, तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. विशेषतः वृद्ध, महिला व विद्यार्थी वर्गाला याचा फटका बसू शकतो. सध्या शहरातील अनेक भागांत अनधिकृत आणि असुरक्षित पद्धतीने बॅनर्स लावले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बॅनर्सना ना परवानगी असते ना योग्य देखभाल. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली असून, अशा बॅनर्सवर कारवाई करावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अशा प्रकारच्या धोकादायक बॅनर्स हटवावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

भाताच्या तुसात लपवून गुटख्याची तस्करी ; १.७८ कोटींचा साठा जप्त

Image
भाताच्या तुसात लपवून गुटख्याची तस्करी ; १.७८ कोटींचा साठा जप्त पालघर – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करून पालघर पोलिसांनी सुमारे १.७८ कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई तलासरी पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली असून, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विकासपाडा येथे दोन ट्रक थांबवून तपासणीदरम्यान ही तस्करी उघडकीस आली. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कर्नाटक राज्यातून दोन कंटेनर ट्रकमधून महाराष्ट्रात गुटख्याचा मोठा साठा आणला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश पोलीस निरीक्षक अजय गोरड (तलासरी पोलिस ठाणे) आणि प्रदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) यांना दिले. संशयास्पद ट्रक क्रमांक KA-56-9490 आणि KA-39-A-3012 हे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जात असताना थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली. ट्रक चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहनांमध्ये तपास केला असता, भाताच्या तुसात लपवलेला गुटखा व तंबाख...

बदली आदेश असूनही अधिकारी पालघरमध्येच; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Image
बदली आदेश असूनही अधिकारी पालघरमध्येच; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह पालघर : राज्यभरात झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदल्यांमध्ये पालघर जिल्ह्यातील अभियंता सचिन गायकवाड यांची बदली डहाणू उपविभागात झाली असूनही, ते अद्याप पालघर उपविभागात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोकण प्रादेशिक कार्यालयाच्या ३० मे २०२५ रोजीच्या आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, आदेश लागू होऊन जवळपास दोन महिने उलटून गेले तरीही गायकवाड यांची बदली अद्याप प्रत्यक्षात आली नसल्याने प्रशासकीय अपारदर्शकतेवर बोट ठेवले जात आहे. दरम्यान, बोईसर विभागातील सुतारपाडा येथील समाज मंदिराच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात वारंवार तक्रारी असूनही, संबंधित ठेकेदाराविरोधात कोणतीही कारवाई झाली नसल्याने अभियंता गायकवाड यांच्यावर ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याचबरोबर, बोईसर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील मुख्य रस्त्यालगत बेकायदेशीर बांधकामे आणि धोकादायक फलकांवर...

नीट चाचणीत कमी गुण मिळाल्याने वडिलांकडून बेदम मारहाण; विद्यार्थिनीचा मृत्यू, शिक्षक वडील अटकेत

Image
नीट चाचणीत कमी गुण मिळाल्याने वडिलांकडून बेदम मारहाण; विद्यार्थिनीचा मृत्यू, शिक्षक वडील अटकेत सांगली – नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे संतापलेल्या शिक्षक वडिलांनी आपल्या १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षक वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव साधना धोंडीराम भोसले (वय १७) असे असून, ती बारावीची विद्यार्थीनी होती. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या साधनाने दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवले होते. मात्र अलीकडे झालेल्या नीटच्या सराव परीक्षेत तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. या बाबत तिच्या वडिलांनी विचारणा केली असता साधनाने “तुम्हालाही कमी गुण मिळायचे, तुम्ही तरी कुठे कलेक्टर झालात?”, असे उत्तर दिले. यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी लाकडी खुंट्याने तिच्यावर बेदम मारहाण केली. पत्नीने मध्यस्थी करून त्यांना थांबवले तरी रात्रीपर्यंत मारहाणीचा सिलसिला सुरूच होता. दुसऱ्या दिवशी योग दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत गेलेले भो...

बोईसर घरफोडी प्रकरणात सराईत गुन्हेगार अटकेत

Image
बोईसर घरफोडी प्रकरणात सराईत गुन्हेगार अटकेत   बोईसर – नवापुर नाका परिसरातील सिध्दीविनायक सोसायटी येथे ४ जुलै २०२५ रोजी दुपारी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना आरोपीकडून चोरी केलेले दागिने घेणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकूण ४ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणात तक्रारदार मंजुदेवी पुरोहीत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सुमारे ४ लाख ६७ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या तक्रारीवरून बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू करत, हिस्ट्रीशीटर आरोपी धोनी ऊर्फ पाजी बच्चनसिंग सोडी (वय २२, रा. आझादनगर, बोईसर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीतील दागिने कार्तिक राकेश मारु (वय २२, रा. नालासोपारा पश्चिम) याच्याकडे दिल्याची कबुली दिली. त्यानंतर कार्तिक मारु...

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड

Image
सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड बोईसर  – बोईसर पूर्वेतील यशवंत सृष्टी परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ आढळल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे  दाखल करण्यात आली आहे. नागझरी परिसरातील एका ग्राहकाने संबंधित हॉटेलमध्ये सूप मागवले असता त्यामध्ये झुरळ असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार ग्राहकाने तत्काळ हॉटेल व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच, घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, अन्न स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून, संबंधित हॉटेलवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गोपाल माहोर यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, प्राथमिक तपास...

बोईसर वाहतूक मोकळी होणार ; रिक्षा व फेरीवाल्यांविरोधात प्रशासन सज्ज"

Image
" बोईसर वाहतूक मोकळी होणार ; रिक्षा व फेरीवाल्यांविरोधात प्रशासन सज्ज" बोईसर – बोईसरमधील नवापूर नाका परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतुकीला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवापूर नाक्यावर यापुढे फक्त आठ रिक्षांना निश्चित केलेल्या जागेतच उभे राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी रेषांकन (मार्किंग) करून जागा निश्चित करण्यात आली आहे. ठराविक जागेबाहेर रिक्षा उभ्या आढळल्यास संबंधित चालकांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. बिकानेरजवळ नवापूर बाजूला रिक्षा उभ्या राहणार नाहीत, अशीही सूचना देण्यात आली आहे. यासंदर्भात दोन दिवसांची सूचना दिल्यानंतर थेट कारवाई सुरू केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी दिली. याशिवाय, रस्त्यालगत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनाही दुकाने मांडण्यास मनाई करण्यात आली आहे. मार्केट परिसरात अनधिकृतपणे अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांना ग्रामपंचायतीकडून नोटीसा बजावण्यात आ...

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आनंदाची भेट

Image
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आनंदाची भेट बोईसर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कुंभवली गावात सामाजिक जाणिवेतून साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळा कुंभवली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. २२ जुलै रोजी झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला आणि चॉकलेट वाटप करून आनंदाचा क्षण साजरा करण्यात आला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे भाव आणि परिसरात पसरलेले उत्साही वातावरण या उपक्रमाचे खरे यश ठरले. या उपक्रमाचे आयोजन भाजप जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विशेषतः कुंभवली ग्रामपंचायतीचे सदस्य आणि भाजप कार्यकर्ते अ‍ॅड. सुमित रमाकांत पिंपळे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला. कार्यक्रमात पालघर पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रणय म्हात्रे , हर्षल पिंपळे , नांदगावचे माजी उपसरपंच सुमित ठाकूर , चिराग संखे आणि कल्पेश पिंपळे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. याशिवाय भाजप कार्यकर्ते, शिक्षकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते...

संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; आदिवासी बांधवांसाठी पालघरमध्येच अपील अर्ज स्वीकारले जाणार

Image
संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; आदिवासी बांधवांसाठी पालघरमध्येच अपील अर्ज स्वीकारले जाणार पालघर – श्रमिक सेनेचे चिटणीस संजय पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, आता आदिवासी बांधवांना अपील अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईच्या कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. हे अर्ज थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातच स्वीकारले जाणार आहेत. पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. जमिनीच्या मालकी हक्कांशी संबंधित अपील अर्ज दाखल करण्यासाठी आदिवासी बांधवांना कोकण आयुक्त कार्यालय, मुंबई येथे जावे लागत होते. हा प्रवास खर्चिक, वेळखाऊ व त्रासदायक ठरत होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत संजय पाटील यांनी जून 2025 मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत ही मागणी जोरदारपणे मांडली. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून हा निर्णय अंमलात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, 8 जुलै 2025 रोजी शासनाने संबंधित आदेश निर्गमित केला. या आदेशानुसार, आता कोकण विभागीय आयुक्त  कार्यालयातील अधिकारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात नियमितपणे उ...

बोईसरमध्ये रहिवासी संकुलांतील व्यावसायिक अतिक्रमण वाढले; सुरक्षा आणि वाहतुकीस मोठा धोका

Image
बोईसरमध्ये रहिवासी संकुलांतील व्यावसायिक अतिक्रमण वाढले; सुरक्षा आणि वाहतुकीस मोठा धोका बोईसर : बोईसर शहरातील अनेक रहिवासी संकुलांमध्ये तळमजल्यावरील फ्लॅट्सचे अनधिकृतपणे व्यावसायिक गाळ्यांमध्ये रूपांतर करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. काही ठिकाणी फ्लॅटच्या भिंती पाडून रस्त्याकडे दरवाजे व शटर बसवले जात असून, त्या ठिकाणी दुकाने, क्लिनिक्स आणि कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. या प्रकारामुळे संकुलातील सामूहिक सुरक्षा व्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षारक्षकांची व्यवस्था मुख्य प्रवेशद्वारापुरती मर्यादित राहिल्याने, बाजूच्या शटरमधून कोणताही व्यक्ती संकुलात नोंद न करता प्रवेश करू शकतो. त्यामुळे चोरी, अनधिकृत व्यक्तींचा वावर आणि संभाव्य गुन्ह्यांचा धोका वाढला आहे, अशी चिंता रहिवाशांनी व्यक्त केली आहे. ◾वाहतूक कोंडीही वाढतेय या दुकाने व कार्यालयांमध्ये येणाऱ्या लोकांची वाहने थेट संकुलाबाहेरील रस्त्यावर लावली जात असल्याने, परिसरात वाहतूक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. "सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी असून ती ...

गुणवंतांचा गौरव, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ – तारापूर मेडिकल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

Image
गुणवंतांचा गौरव, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ – तारापूर मेडिकल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम तारापूर  – तारापूर मेडिकल वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने मोहम्मद उर्दू शाळेतील जैनबिया हॉलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मोफत वह्यांचे वाटप सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वद फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुचिता पाटील होत्या. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तारापूर ग्रामपंचायतच्या सरपंच संध्या पागधरे, मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष शोएब अत्तारी, मोहम्मदवाला ट्रस्टचे सेक्रेटरी नासरुद्दीन सोपरकर, ग्रामपंचायत सदस्य जरीना दमणवाला, निलेश पाटील, इब्राहिम मेमन, अशरफ गवंडी, आवेश मेमन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुचिता पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हिंदू-मुस्लिम ऐक्य हे तारापूरची ओळख आहे. शिक्षण हेच खरे सामर्थ्य असून, जिद्द आणि सातत्य ठेवले तर कोणतेही शिखर गाठता येते.”  कार्यक्रमात 85% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी प्रत्येक...