Posts

Showing posts from January, 2025

पालघर जिल्ह्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरण व नागरिकांच्या सुरक्षेला धोका

Image
पालघर जिल्ह्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरण व नागरिकांच्या सुरक्षेला धोका पालघर: पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर प्रकल्पांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन सुरू आहे. परंतु याठिकाणी बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन होत असल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी आवश्यक परवानगी न घेता आणि मर्यादेच्या बाहेर खनिज काढले जात आहेत. यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्यासोबतच, परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गौण खनिज, जसे की मुरूम, खडक, माती आणि वाळू या प्रकल्पांसाठी आवश्यक असतात. विशेषत: मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर महत्वकांक्षी प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर यांचा वापर होतो. परंतु काही ठिकाणी यासाठी इतर ठिकाणांवर उत्खनन सुरू आहे आणि यावर योग्य परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी जुन्या परवानग्यांवर कार्य सुरू आहे आणि मर्यादेपेक्षा जास्त खनिज काढले जात आहेत. मात्र, खनिज वाहतूक करताना काही गंभीर सुरक्षा प्रश्न देखील समोर आले आहेत. मुरूम वाहून नेणाऱ्या वाहनांवर कापड किंवा प्लास्टिक लावले जात नाही, ज्यामुळे रस्...

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पालघर तालुका अध्यक्षपदी आशिष संखे यांची नियुक्ती

Image
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पालघर तालुका अध्यक्षपदी आशिष संखे यांची नियुक्ती पालघर, २६ जानेवारी २०२५: निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पालघर तालुक्यातील अध्यक्षपदी  आशिष संखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा संकल्प पालघर तालुक्यातील पर्यावरणीय संवर्धन व प्रदूषण नियंत्रणाच्या कार्यासाठी नवा उत्साह निर्माण करेल, असे जिल्हाध्यक्ष प्रविण संखे सांगितले. आशिष संखे हे पर्यावरणीय समज आणि सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांनी विविध सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेतला असून, पर्यावरणासह समाजाच्या कल्याणासाठी काम करण्याची त्यांची प्रगल्भ दृष्टी आणि अनुभव यामुळे त्यांची ही नियुक्ती योग्य ठरली आहे. तसेच पालघर तालुक्यात पर्यावरण रक्षण व प्रदूषण निवारणाच्या कार्यात अधिक गती येईल, असे विश्वास व्यक्त करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक समुदायांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. आशिष संखे यांनी आपल्या नियुक्तीनंतर संवाद साधताना सांगितले, "पालघर तालुक्यात पर्यावरण संरक्षणासाठी व प्...

एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट कडून 'भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025' मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Image
एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट कडून 'भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025' मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न मुंबई – एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट कडून 'भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025' हॉटेल जिंजर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले. या सोहळ्याला ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी अध्यक्ष डॉ. घनशाम कोळंबे, डॉ. एम. पी. जेकब, मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मेमाणे, सिनियर उपाध्यक्ष डॉ.राज काळे, डॉ. राज शेखर, डॉ. अमजद खान पठाण, माजी महापौर बाबूभाई भवानजी, चित्रपट दिग्दर्शक अंकुर मेहबुक खान, बिग बॉस फेम रोहित शिंदे, मंदार तांडेल, दीपक गिलानी (फॅशन डिझायनर), ए. सी. पी. रीहाना शेख, दिग्दर्शक राहुल वूरा, अभिनेते नितीन देसाई, ट्रस्टचे समन्वयक संतोष हंकारे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.  गेल्या 11 वर्षांपासून एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट आरोग्य शिबीर, अन्नदान आणि इतर सामाजिक उपक्रम राबवत आहे. ट्रस्टने मुंबई आणि दिल्लीमध्ये मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित केले. यावेळी राजकीय नेते, पोलीस अधिकारी, डॉक्टर, चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, उत्तर प्रदेशमधील ...

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

Image
रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू पालघर : पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ २३ जानेवारी रोजी एक धक्कादायक घटना घडली. माकने गावातील १६ वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी रावल हिचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. ती इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी होती आणि कानात इअरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असताना गुजरातकडे जात असलेल्या राजधानी एक्सप्रेसने तिला धडक दिली. या अपघातामुळे वैष्णवी जागीच मृत्यूमुखी पडली. घटनास्थळी गर्दी झाली असून परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. माकणी गावाच्या परिसरात पश्चिम रेल्वेच्या रुळ ओलांडण्यासाठी पादचारी पुलाचा अभाव असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडतात. विशेषत: विद्यार्थ्यांना मोबाईल फोन आणि इअरफोनचा वापर अधिक असल्याने येणाऱ्या गाड्यांचा आवाज त्यांना ऐकू येत नाही, आणि यामुळे अनेक वेळा असे अपघात घडतात. वैष्णवीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्थानिक रहिवाशांच्या मागणीला मान देऊन रुळ ओलांडण्यासाठी पादचारी पुल तयार करावा अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये इअरफोन वापरण्यामुळे होणाऱ्य...

गुजरात गॅस पाईपलाईन पुन्हा लिकेज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Image
गुजरात गॅस पाईपलाईन पुन्हा लिकेज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये गुजरात गॅस पाईपलाईन लिकेजच्या वारंवार घटना घडत असून ही तीसरी घटना आहे त्यामुळे आता नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये सोमवारी दुपारी पुन्हा एकदा गुजरात गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. कोलवडे रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ता दुरुस्ती व गटार बांधणीच्या कामादरम्यान जेसीबीच्या बकेटचा धक्का लागून गॅस पाईपलाईन लिकेज झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गॅसचा रिसाव झाल्याची माहिती मिळताच गुजरात गॅसच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, याआधीही एमआयडीसीतील जे प्लॉटमध्ये अशाच प्रकारे जेसीबीच्या धडकेने गॅस लिकेज झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने गुजरात गॅस प्रशासनाने पाईपलाईनच्या देखरेखीसाठी पगारधारक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असली, तरीही वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्...

५० उठाबश्याच्या शिक्षेनंतर विद्यार्थिनीला उलट्या व पोटदुखीचा त्रास

Image
पालघरच्या भगिनी समाज शाळेतील धक्कादायक प्रकार  ५० उठाबश्याच्या शिक्षेनंतर विद्यार्थिनीला उलट्या व पोटदुखीचा त्रास   पालघर : भगिनी समाज शाळेत दहावीत शिकणारी विद्यार्थिनी द्विता विनोद पाटील हिला शाळेत यायला उशीर झाल्याने कडव्या शिक्षेमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. फक्त पाच मिनिट उशीर झाले म्हणून मुख्याध्यापिकेने तिला 50 उठाबशा काढायला लावल्या , ज्यामुळे तीला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला आहे. सध्या तिच्यावर एक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप आहे, त्यांनी मुख्याध्यापिकेवर मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा आरोप केला आहे. द्विताच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शाळा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. हे प्रकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी चिंताजनक आहेत आणि अशा शिक्षण पद्धतीवर कठोर कारवाईची मागणी पालकांकडून केली जात आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने तारापूर पोफरण येथे महिला मेळावा संपन्न

Image
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने तारापूर पोफरण येथे महिला मेळावा संपन्न तारापूर : महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघर च्या वतीने 16 जानेवारी रोजी तारापूर पोफरण येथे महिला मेळावा पोफरण गावच्या सरपंच प्रीती ठाकूर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे, एडवोकेट निखिल राऊत ,उपसरपंच सचिन ठाकूर ,बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, पर्यवेक्षिका दिपाली संखे ,दिपाली पाटील विस्तार अधिकारी , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभवी देशपांडे, तारापूर पोलीस ठाण्याचे महिला पोलीस अधिकारी प्रशीला मॅडम व नीता भोईर , अंगणवाडी सेविका ,मदतनीस , आशा, पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी,गावातील महिला व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.परिषद सदस्य भावना विचारे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की अंगणवाडीच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे तसेच महिलांचा आहाराबाबत माहिती देऊन अंगणवाडीच्या कामाचे कौतुक केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरप...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानी दिला बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

Image
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानी दिला बेमुदत संपावर जाण्याचा इशारा  पालघर : जिल्ह्यात ४७३ ग्रामपंचायत असून त्यात काम करणाऱ्या ८००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना गेला पाच महिन्यापासून वेतन मिळाले नसल्यामुळे याच कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता करून देणे करोना काळात केलेल्या कामाचा अतिरिक्त भत्ता देणे अशा अनेक मागण्यांना वाचा फोडण्यासाठी निवेदन देण्यात आले असून तातडीने या मागण्या मान्य न केल्यास १ फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात ४७३ ग्रामपंचायत आहेत त्यामध्ये ८००० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या ५०% रक्कम राज्य सरकारकडून प्राप्त होत असते तर उर्वरीत ५०% रक्कम ग्रामपंचायत देते  मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतीचे उत्पन्न अत्यल्प असल्याने शासकीय अनुदानावरच त्यांचा अवलंबून राहावे लागते. करोना काळात रात्रंदिवस राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला एक हजार रुपये प्रति महिना भत्ता राज्यात अनेक ग्रामपंचायती...

महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा दर्शन घेऊन परतताना मृत्यू

Image
महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा दर्शन घेऊन परतताना मृत्यू पालघर : डहाणूच्या प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा दर्शन घेऊन परतताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . मिलन डोंबरे असं या पंचवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे. मिलन डोंबरे हा त लासरी तालुक्यातील वेवजी येथील र हिवासी असून सकाळी पहाटे आपल्या कुटुंबीयांसोबत डहाणूच्या प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी गडावर निघाला दर्शनासाठी जाताना मिलन गडावर हजार पायऱ्या सहजच चढला मात्र उतरताना त्याला अचानक उलटी झाली मीनल ला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला खाली उतरताना खूप त्रास होऊ लागला मात्र त्याच्यासोबत असलेला त्याच्या भावाने त्याला खांद्यावर घेत त्याला हॉस्पिटलला प्रथम उपचार कसा मिळेल या दृष्टिकोनातून त्यांची धडपड सुरू झाली मिलन च्या कुटुंबीयांनी मिलन ला खांद्यावर घेऊन कासा उपजिल्हा रुग्णालय गाठलं मात्र तोपर्यंत मिलन चा अर्ध्या वाटेतच मृत्यू झाला होता .पोटात अन्न नसताना अति उंचावर चालल्याने मिलनचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे . दरम्यान सवय नसेल तर अ...

बोईसर कला क्रीडा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १६९ शाळेतील १८८०५ विद्यार्थ्यांचा सहभाग

Image
बोईसर कला क्रीडा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १६९ शाळेतील १८८०५ विद्यार्थ्यांचा सहभाग   बोईसर : महाराष्ट्र स्पोर्टस एज्युकेशन ॲकॅडमी - तारापूर या संस्थेतर्फे प्रतिवर्षी आयोजित बोईसर कला क्रीडा महोत्सव २०२५ हे ९ ते १२ जानेवारी या कालावधीत संपन्न झाले. सन २००६ पासून सातत्याने हा महोत्सव यशस्वीपणे संपन्न होत असून महोत्सवाचे हे एकोणीसावे वर्ष होते. यात ४८ कला क्रीडा प्रकारात, १५७  स्पर्धा प्रकार, यामध्ये १६९ शाळांचा सहभाग होता. त्यात १८८०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूर, आयोजित बोईसर कला-क्रीडा महोत्सव वर्ष-१९ वे, सहआयोजक डॉन बॉस्को स्कूल बोईसर व बोईसर एज्युकेशन सोसायटी मधील सर्व सदस्यांनी खोदराम बाग मैदानावर महोत्सव यशस्वीपणे पार पाडला. यात ४८ कला क्रीडा प्रकारात, १५७  स्पर्धा प्रकार, यामध्ये १६९ शाळांचा सहभाग होता. त्यात १८८०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध कला व क्रीडा प्रकारांचा उत्सव ज्यामध्ये सांस्कृतिक आणि शारीरिक कौशल्य पाहायला मिळतो. यामध्ये पारंपरिक व आधुनिक कलेचे सादरीकरण , विविध खेळांचे आयोजन तसेच गट सामूहि...

ब्ल्यू डायमंड हॉटेल वाल्याने अडवला मुख्य रस्ता ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Image
ब्ल्यू डायमंड हॉटेल वाल्याने अडवला मुख्य रस्ता ; ग्रामपंचायतीचे  दुर्लक्ष बोईसर : बोईसर नवापूर रोड वरील मुख्य रस्त्यालगत ब्लू डायमंड हॉटेल असून या ठिकाणी मुख्य रस्त्यावर लोखंडी पाईप टाकून लोखंडी साखळी लावून रस्ता अडवणूक केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते व पदपथावर चालणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे परंतू ग्रामपंचायत कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत असल्यामुळें नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्राकडे तसेच आजुबाजुच्या इतर गावाकडे जाण्यासाठी बोईसर वरून नवापूर रोड हा मुख्य रस्ता असून याच नवापूर रोडवरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या ब्ल्यू डायमंड हॉटेल वाल्यांनी भर रस्त्यावर लोखंडी पाईप व चेन साखळी लावल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिक अरुंद झाला आहे. त्यामुळे रस्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहांनाची व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामपंचायत या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहे. हॉटेल वाल्याने लोखंडी पाईप व चेन रस्त्यावर मांडून वाहतूक कोंडी करू नये, अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत. तसेच काही दिवसापूर्वी वाहतूक शाखेच्या मदतीने बोईसर ग्रामपं...