रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू
रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू
पालघर : पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ २३ जानेवारी रोजी एक धक्कादायक घटना घडली. माकने गावातील १६ वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी रावल हिचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. ती इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी होती आणि कानात इअरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असताना गुजरातकडे जात असलेल्या राजधानी एक्सप्रेसने तिला धडक दिली.
या अपघातामुळे वैष्णवी जागीच मृत्यूमुखी पडली. घटनास्थळी गर्दी झाली असून परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. माकणी गावाच्या परिसरात पश्चिम रेल्वेच्या रुळ ओलांडण्यासाठी पादचारी पुलाचा अभाव असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडतात. विशेषत: विद्यार्थ्यांना मोबाईल फोन आणि इअरफोनचा वापर अधिक असल्याने येणाऱ्या गाड्यांचा आवाज त्यांना ऐकू येत नाही, आणि यामुळे अनेक वेळा असे अपघात घडतात.
वैष्णवीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्थानिक रहिवाशांच्या मागणीला मान देऊन रुळ ओलांडण्यासाठी पादचारी पुल तयार करावा अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये इअरफोन वापरण्यामुळे होणाऱ्या अपघातांबाबत जागरूकता वाढवण्याची आवश्यकता आहे. स्वयंसेवी संघटना, पोलिस विभाग आणि शालेय संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि जागरूकतेच्या कार्यक्रमांची आखणी केली पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या अपघातांचा टाळाव होईल.
Comments
Post a Comment