ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानी दिला बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानी दिला बेमुदत संपावर जाण्याचा इशारा 


पालघर : जिल्ह्यात ४७३ ग्रामपंचायत असून त्यात काम करणाऱ्या ८००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना गेला पाच महिन्यापासून वेतन मिळाले नसल्यामुळे याच कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता करून देणे करोना काळात केलेल्या कामाचा अतिरिक्त भत्ता देणे अशा अनेक मागण्यांना वाचा फोडण्यासाठी निवेदन देण्यात आले असून तातडीने या मागण्या मान्य न केल्यास १ फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.


जिल्ह्यात ४७३ ग्रामपंचायत आहेत त्यामध्ये ८००० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या ५०% रक्कम राज्य सरकारकडून प्राप्त होत असते तर उर्वरीत ५०% रक्कम ग्रामपंचायत देते मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतीचे उत्पन्न अत्यल्प असल्याने शासकीय अनुदानावरच त्यांचा अवलंबून राहावे लागते. करोना काळात रात्रंदिवस राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला एक हजार रुपये प्रति महिना भत्ता राज्यात अनेक ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आला मात्र पालघर जिल्ह्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना १९ महिन्याचा विशेष प्रोत्साहनपर भत्ता पासून वंचित ठेवण्यात आले आहे. ती रक्कम जिल्हा परिषदेने तातडीने अदा करावी अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तिका वर्ग करणे, भविष्य निर्वाह निधीचा भरणा करणे व इतर सेवा विषयक बाबींची पूर्ततेसाठी क्षेत्रनिहाय विशेष सभा घेऊन अथवा शिबिराचे आयोजन करून पूर्तता करावी ही मागणी दुर्लक्षित राहिलेली आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंग अथवा इतर कारणांमुळे कारवाई करण्यात आलेली आहे अशा कर्मचाऱ्यांवरील  कारवाईविरुद्ध अपील करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिलेला असताना तो उलटल्यानंतर देखील निकालपत्र त्यांचे आदेश दिले गेले नाहीत यामुळे कर्मचारी अपील करण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे कारवाईचे कागदपत्र तातडीने पुरवण्यात यावे असे मागणी देखील संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. बेकायदा इतवृत्त लिहणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे हे जिल्हा परिषदेच्या निदर्शने देण्यात आले आहे बहुतांश ग्रामसेवक इतवृत्त सादर करत नसल्याने सर्व ग्रामसेवकांकडून तातडीने इतवृत्त जमा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने करावे अशी मागणी देखील संघटनेने केली आहे .



◾चौकशी फेऱ्यात अडकवून कर्मचाऱ्यांना दमकावणी 


 दरम्यान बोईसर ग्रामपंचायतीत काम करणारे परीक्षीत ठाकूर यांच्याकडे घरपट्टी आकारणी, कमी वाढ करणे, रद्द करणे  या संदर्भात संगणकावर कोड (पासवर्ड)  देण्यात आले नसताना पालघर पंचायत समितीकडून एकतर्फी चौकशी करून  त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली  या प्रकरणात खरा दोषी मोकाट असून या प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी करावी या करिता  संघटनेने जिल्हा परिषदेचे लक्ष वेधले आहे.

सफाई कर्मचाऱ्यांची घरे तोडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधून घर देऊ असे न्यायालयात लेखी दिलेले असताना देखील गेल्या चार महिन्यापासून भाडे देण्यात आले नाही तर या प्रकरणात पाठपुराठा करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास कामावरून घरी बसवण्यात येईल अशी दमकावणी बोईसर ग्रामपंचायतीकडून दिल्याचे कर्मचारी संघटनेचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांच्या निर्देश आणून देण्यात आली आहे. 



◾करोना काळात राबणारा कर्मचारी उपाशी तर ग्रामसेवक तुपाशी 


करोना काळात बोईसर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र उत्तम कामगिरी केल्यामुळे  शासन स्तरावर पुरस्कारासाठी तसा प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्या प्रस्तावाचा फायदा ग्रामसेवकांनी घेतलेला असताना दिवसरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ रोखून त्यांना उपाशी मात्र ग्रामसेवक पुरस्कार घेऊन तुपाशी असल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 


 ◾करोना काळात विशेष सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा भत्ता देण्यात आला होता. या भत्त्यापासून कोणी वंचित राहिल्याचे निदर्शनात आणून दिल्यास तो त्यांना अदा करण्यात येईल तसेच कर्मचारी विरुद्ध कारवाई झाल्या असताना आवश्यक असणारी कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी सूचना संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे : चंद्रशेखर जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा पं ) जि प पालघर

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू