पालघर जिल्ह्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरण व नागरिकांच्या सुरक्षेला धोका
पालघर जिल्ह्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरण व नागरिकांच्या सुरक्षेला धोका
पालघर: पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर प्रकल्पांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन सुरू आहे. परंतु याठिकाणी बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन होत असल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी आवश्यक परवानगी न घेता आणि मर्यादेच्या बाहेर खनिज काढले जात आहेत. यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्यासोबतच, परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गौण खनिज, जसे की मुरूम, खडक, माती आणि वाळू या प्रकल्पांसाठी आवश्यक असतात. विशेषत: मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर महत्वकांक्षी प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर यांचा वापर होतो. परंतु काही ठिकाणी यासाठी इतर ठिकाणांवर उत्खनन सुरू आहे आणि यावर योग्य परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी जुन्या परवानग्यांवर कार्य सुरू आहे आणि मर्यादेपेक्षा जास्त खनिज काढले जात आहेत.
मात्र, खनिज वाहतूक करताना काही गंभीर सुरक्षा प्रश्न देखील समोर आले आहेत. मुरूम वाहून नेणाऱ्या वाहनांवर कापड किंवा प्लास्टिक लावले जात नाही, ज्यामुळे रस्त्यावर माती पडून अपघात होण्याचा धोका वाढलेला आहे. नानिवली भागात, ट्रकमधून पडलेल्या दगडामुळे एका इको गाडीला मोठा अपघात झाला. गाडीचे नुकसान झाले असून, शुक्रवारी जीवन हानी टळली.
याशिवाय, मोंटो कार्लो कंपनीने मुंबई-वडोदरा महामार्गासाठी माती-मुरूम भरण्याचे काम सुरू केले आहे. हे काम रात्रंदिवस चालू असल्यामुळे, गावकऱ्यांची झोप उडालेली आहे आणि संपूर्ण परिसर हादरलेला आहे. सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे ग्रामस्थांना जीवित हानी होण्याची भीती आहे.
ग्रामस्थांनी यावर चिंता व्यक्त केली असून, गौण खनिज उत्खनन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील करण्यात आले आहे. या परिस्थितीवर त्वरित कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
या प्रकरणावर प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment