पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न कायम; हजारो बालकांचे आरोग्य धोक्यात

पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न कायम; हजारो बालकांचे आरोग्य धोक्यात पालघर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन दहा वर्षे पूर्ण झाली असली, तरी अजूनही जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या गंभीरच आहे. विशेषतः विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू, पालघर आणि वसई या तालुक्यांमध्ये कुपोषणाची स्थिती चिंताजनक असल्याचे महिला व बाल विकास विभागाच्या फेब्रुवारी २०२५ च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, जिल्ह्यात ३३ अती तीव्र कुपोषित (SAM) आणि ७१२ तीव्र कुपोषित (MAM) बालकांची नोंद झाली आहे. जव्हार (३३४), विक्रमगड (१३४) आणि मोखाडा (७६) या तालुक्यांमध्ये कुपोषित बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आदिवासी भागांतील बालकांचे आरोग्य धोक्यात पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, डहाणू आणि तलासरी हे आदिवासीबहुल तालुके आहेत. येथील बहुतांश कुटुंबे शेती, मजुरी आणि जंगल संसाधनांवर अवलंबून आहेत. मात्र, रोजगाराच्या संधी कमी, आर्थिक दुर्बलता, अपुऱ्या आरोग्य सेवा आणि शिक्षणाचा अभाव यामुळे बालकांना योग्य पोषण मिळत नाही. परिणामी, जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कुपोषणाची...