पाम गावात जलजीवन मिशनच्या कामात सुरक्षेचा अभाव

पाम गावात जलजीवन मिशनच्या कामात सुरक्षेचा अभाव

बोईसर : पाम गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. मजुरांना कोणतीही सुरक्षा साधने न पुरवता त्यांच्याकडून धोकादायक परिस्थितीत काम करवून घेतले जात आहे. त्यामुळे कामगारांचे जीव धोक्यात असून, अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाळू माफियांना प्रशासनाचा अभय?

याशिवाय, या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाळूचा उपसा नियमबाह्य पद्धतीने होत असून, त्यावर कोणतीही अधिकृत परवानगी नाही. प्रतिबंध असतानाही ही वाळू खुलेआम उपसली जात असून, त्याची सर्रास विक्री होत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडतो आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.


सदर प्रकारामुळे पाम गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू