प्लास्टिक मुक्त, दुर्गंधीमुक्त पालघर जिल्हा" मोहिमेचा शुभारंभ – पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते

प्लास्टिक मुक्त, दुर्गंधीमुक्त पालघर जिल्हा" मोहिमेचा शुभारंभ – पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते 

"अधिकारी आणि कर्मचारी यांनी जनतेची कामे तात्काळ मार्गी लावावीत" – पालकमंत्री गणेश नाईक



पालघर
– "जनतेच्या सेवेसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्पर राहावे आणि नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावावीत," असे स्पष्ट निर्देश राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात समाधान शिबिर आणि समिती सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार राजन नाईक, आमदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, माजी जि. प. अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

◾पालघरला प्लास्टिक मुक्त आणि दुर्गंधी मुक्त करण्याचा संकल्प

पालघर जिल्ह्यात "प्लास्टिक मुक्त आणि दुर्गंधी मुक्त मोहिम" प्रभावीपणे राबवण्यासाठी नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. रस्त्यालगत असलेल्या दुकानमालकांशी चर्चा करून कचरा व्यवस्थापन आणि दुर्गंधी निर्मूलनासाठी उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. तसेच, मोहिमेत भरीव योगदान देणाऱ्यांना बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


◾100 दिवसांचा संकल्प – जिल्हा प्रशासनाला सात कलमी उद्दिष्टे

राज्य शासनाने 100 दिवसांचा विशेष संकल्प हाती घेतला असून, या कालावधीत जिल्हा प्रशासनाने सात कलमी उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.


◾80% प्रकरणे मार्गी, उर्वरित कौटुंबिक तडजोडीतून सोडवणार

याआधीच्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 80% समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित 20% प्रकरणे प्रामुख्याने कौटुंबिक स्वरूपाची असून, तीही लवकरच सोडवली जातील. न्यायालयीन प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.


◾"सामान्य जनतेची सेवा हीच खरी सेवा" – पालकमंत्री नाईक

"कोणत्याही प्रतिष्ठित पदावर काम करत असताना सामान्य जनतेच्या सेवेसाठी झटले पाहिजे. कोणतेही पद कायम राहात नाही, पण केलेली सेवा कायम स्मरणात राहते," असे मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले.


◾समाधान शिबिरात 21 विभागांचे स्टॉल, नागरिकांना प्रमाणपत्र वाटप

समाधान शिबिराच्या माध्यमातून 21 शासकीय विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. मागील जनता दरबारात अर्ज केलेल्या व ज्यांचे प्रश्न मार्गी लागले, अशा नागरिकांना 

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते समाधान प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.


सरकार आपल्या दारी, सरकार आपल्या घरात, सरकार आपल्या अंगणात या संकल्पनेतून प्रशासन आता गावपातळीपर्यंत पोहोचत आहे. प्रशासन अधिक गतिमान होऊन नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवेल, असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.प्लास्टिक मुक्त, दुर्गंधीमुक्त पालघर जिल्हा" मोहिमेचा शुभारंभ – पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते 


"अधिकारी आणि कर्मचारी यांनी जनतेची कामे तात्काळ मार्गी लावावीत" – पालकमंत्री गणेश नाईक




पालघर – "जनतेच्या सेवेसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्पर राहावे आणि नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावावीत," असे स्पष्ट निर्देश राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात समाधान शिबिर आणि समिती सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी आमदार राजन नाईक, आमदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, माजी जि. प. अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


पालघरला प्लास्टिक मुक्त आणि दुर्गंधी मुक्त करण्याचा संकल्प

पालघर जिल्ह्यात "प्लास्टिक मुक्त आणि दुर्गंधी मुक्त मोहिम" प्रभावीपणे राबवण्यासाठी नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. रस्त्यालगत असलेल्या दुकानमालकांशी चर्चा करून कचरा व्यवस्थापन आणि दुर्गंधी निर्मूलनासाठी उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. तसेच, मोहिमेत भरीव योगदान देणाऱ्यांना बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


100 दिवसांचा संकल्प – जिल्हा प्रशासनाला सात कलमी उद्दिष्टे

राज्य शासनाने 100 दिवसांचा विशेष संकल्प हाती घेतला असून, या कालावधीत जिल्हा प्रशासनाने सात कलमी उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.


80% प्रकरणे मार्गी, उर्वरित कौटुंबिक तडजोडीतून सोडवणार

याआधीच्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 80% समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित 20% प्रकरणे प्रामुख्याने कौटुंबिक स्वरूपाची असून, तीही लवकरच सोडवली जातील. न्यायालयीन प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.


"सामान्य जनतेची सेवा हीच खरी सेवा" – पालकमंत्री नाईक

"कोणत्याही प्रतिष्ठित पदावर काम करत असताना सामान्य जनतेच्या सेवेसाठी झटले पाहिजे. कोणतेही पद कायम राहात नाही, पण केलेली सेवा कायम स्मरणात राहते," असे मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले.


समाधान शिबिरात 21 विभागांचे स्टॉल, नागरिकांना प्रमाणपत्र वाटप

समाधान शिबिराच्या माध्यमातून 21 शासकीय विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. मागील जनता दरबारात अर्ज केलेल्या व ज्यांचे प्रश्न मार्गी लागले, अशा नागरिकांना 

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते समाधान प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.


सरकार आपल्या दारी, सरकार आपल्या घरात, सरकार आपल्या अंगणात या संकल्पनेतून प्रशासन आता गावपातळीपर्यंत पोहोचत आहे. प्रशासन अधिक गतिमान होऊन नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवेल, असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू