मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यात जनजीवन विस्कळीत – अनेक रस्ते बंद, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यात जनजीवन विस्कळीत – अनेक रस्ते बंद, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

पालघर  – विक्रमगड तालुक्यात आज दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, ओहळ व पुलांना पूर आला असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार खालील मार्ग पूर्णतः बंद करण्यात आले आहेत:

1️⃣ शीळ–देहर्जे रस्ता: देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 


2️⃣ सारशी–शोळशेत रस्ता: सारशी गावाजवळील ओहळावरचा मोरी पूल जलमय झाल्याने वाहतूक बंद आहे. 


3️⃣ कुरंझे–कंचाड रस्ता: याठिकाणी असलेला पूल देखील पाण्याखाली गेला आहे आणि वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.


प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून नदी-ओढ्यांच्या परिसरात अनावश्यक हालचाल टाळण्याचे निर्देश दिले गेले आहेत.


⛔ कृपया स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षिततेची काळजी घ्या.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक