मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यात जनजीवन विस्कळीत – अनेक रस्ते बंद, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यात जनजीवन विस्कळीत – अनेक रस्ते बंद, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

पालघर  – विक्रमगड तालुक्यात आज दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, ओहळ व पुलांना पूर आला असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार खालील मार्ग पूर्णतः बंद करण्यात आले आहेत:

1️⃣ शीळ–देहर्जे रस्ता: देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 


2️⃣ सारशी–शोळशेत रस्ता: सारशी गावाजवळील ओहळावरचा मोरी पूल जलमय झाल्याने वाहतूक बंद आहे. 


3️⃣ कुरंझे–कंचाड रस्ता: याठिकाणी असलेला पूल देखील पाण्याखाली गेला आहे आणि वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.


प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून नदी-ओढ्यांच्या परिसरात अनावश्यक हालचाल टाळण्याचे निर्देश दिले गेले आहेत.


⛔ कृपया स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षिततेची काळजी घ्या.

Comments

Popular posts from this blog

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

मुंबई-पालघर सागरी महामार्गाला मंजुरी! प्रवास होणार वेगवान