पालघर सार्वजनिक बांधकाम विभागावर निविदा प्रक्रियेत नियम बदलून ठेकेदारांना फायदा पोहोचवल्याचा आरोप

पालघर सार्वजनिक बांधकाम विभागावर निविदा प्रक्रियेत नियम बदलून ठेकेदारांना फायदा पोहोचवल्याचा आरोप

पालघर : पालघर सार्वजनिक बांधकाम विभागावर निविदा प्रक्रियेत मूळ नियमांमध्ये फेरबदल करून ठराविक ठेकेदारांना लाभ देण्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणी ‘जागृती ऍग्रो इंटरप्रायझेस’ या कीटकनाशक फवारणी करणाऱ्या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, सदर निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत अ व ब, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय याठिकाणी कीटकनाशक फवारणी व कीटक नियंत्रणासाठी सुमारे ३३ लाख रुपयांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागवण्यात आली आहे. मात्र, यामध्ये "कीटकनाशक परवाना धारक" ही मूलभूत अट बाजूला ठेवत "सिव्हिल शाखेतील सुशिक्षित बेरोजगार" यांच्याकडून निविदा मागवण्यात आल्याने अनुभव असलेल्या एजन्सींना प्रक्रियेतून डावलण्यात आले आहे.


जागृती ऍग्रोने तक्रारीत नमूद केले आहे की, “कीटकनाशक फवारणीसाठी आवश्यक प्रमाण, सुरक्षितता आणि रासायनिक प्रक्रिया याचा सिव्हिल अभियंत्यांना अनुभव नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने फवारणी झाल्यास मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अट अन्यायकारक असून, परवाना धारक एजन्सींना काम देण्यात यावे.”


◾यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता महेंद्र किणी यांनी सांगितले, “या संपूर्ण विषयाची माहिती घेऊनच योग्य त्या प्रकारे उत्तर दिले जाईल.”


सदर प्रकारामुळे निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सदर निर्णयामागील हेतू आणि त्याचा लाभ कोणाला झाला याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू