पँथर्स आघाडीच्या नेतृत्वाखाली वर्धापन दिन, कामगार दिन आणि महापुरुष जयंतीचा गौरवशाली सोहळा
पँथर्स आघाडीच्या नेतृत्वाखाली वर्धापन दिन, कामगार दिन आणि महापुरुष जयंतीचा गौरवशाली सोहळा
पँथर्स आघाडीच्या नेतृत्वाखाली बहुजन शक्तीचा भव्य जागर
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे संस्थापक व सर्वेसर्वा पँथर अविश राऊत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाभरातून, तसेच विविध तालुक्यांमधून हजारो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पँथर अविश राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “राष्ट्रीय पँथर्स आघाडी ही संघटना केवळ संघटना नसून एक संविधानिक लढ्याची चळवळ आहे. विषमतावादी व्यवस्थेवर प्रहार करत संविधानातील मूल्ये – समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय – या तळागाळातील वंचित, शोषित आणि पीडित जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”
यावेळी त्यांनी संविधान हा संघटनेचा आत्मा असल्याचे ठामपणे सांगितले. “सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेपासून वंचित ठेवण्यात आलेल्या समूहांना सत्तेच्या केंद्रस्थानी आणणे आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणे हे संघटनेचे प्रथम कर्तव्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘बहुजन समाजभूषण पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांद्वारे त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचा एक विशेष भाग ठरला तो ‘आदर्श ग्राम पुरस्कार 2025’. या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी मौजे टेंभोडे या गावाची निवड करण्यात आली. गावाने सामाजिक विकास, स्वच्छता, एकता आणि लोकसहभागाच्या माध्यमातून इतर गावांसाठी आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे या गावाचा सन्मान करत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीने विशेष मेहनत घेतली. उत्सवमूर्ती वातावरण, सामाजिक सलोखा, सांस्कृतिक बांधिलकी आणि संघटनात्मक शक्ती याचे जिवंत चित्र या कार्यक्रमात पाहायला मिळाले.
Comments
Post a Comment