आईशी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन ७० वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून – २२ वर्षीय तरुण अटकेत

आईशी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन ७० वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून – २२ वर्षीय तरुण अटकेत

बोईसर : पालघर जिल्ह्यातील वावे-डोंगरीपाडा या गावात एका ७० वर्षीय महिलेचा झोपेत असताना गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, अवघ्या काही तासांत पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीने केवळ आपल्या आईशी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून वृद्धेचा खून केल्याची कबुली दिली आहे.

रवु रामचंद्र कामडी (वय ७०) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव असून, दि. २० मे रोजी पहाटे सुमारे ६.१५ वाजता गावातील समाज मंदिरात झोपलेल्या असताना, अज्ञात इसमाने त्यांच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला व नंतर गळा आवळून ठार मारले.


या प्रकरणी मयत महिलेचे नातू विपुल दशरथ धोदडे (वय २८) यांनी तारापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.


या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पालघर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तारापूर पोलिसांनी संयुक्त तपासपथक तयार केले.


 तपासादरम्यान अंकेश विलास सवरे (वय २२, रा. वावे-डोंगरीपाडा, परनाळी) याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने खुनाची कबुली देताना सांगितले की, “मयत महिला सतत माझ्या आईशी भांडायची, त्यामुळे रागाच्या भरात मी तिचा खून केला.”


तसेच, पोलिसांनी मयत महिलेवर खून करण्यापूर्वी अतिप्रसंग झाल्याची शक्यता वर्तवली असून, या दृष्टीने वैद्यकीय तपासणी व सखोल चौकशी सुरू आहे.


या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी  विकास नाईक हे करत असून, या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू